Public interest litigation in Supreme Court to cancel India-Pakistan T20 match
नवी दिल्ली : आशिया कपचा भाग म्हणून दुबईमध्ये १४ सप्टेंबर रोजी होणारा भारत-पाकिस्तान टी-२० क्रिकेट सामना रद्द करण्याची मागणी करत सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका (पीआयएल) दाखल करण्यात आली आहे.
उर्वशी जैन यांच्या नेतृत्वाखालील चार कायद्याच्या विद्यार्थ्यांनी ही याचिका दाखल केली असून, अधिवक्ता स्नेहा राणी, अभिषेक वर्मा आणि मोहम्मद अनस चौधरी यांच्या माध्यमातून ती सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आली आहे.
याचिकाकर्त्यांच्या मते, अलीकडील पहलगाम दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतीय नागरिक व सैनिकांनी बलिदान दिल्यानंतर पाकिस्तानसोबत क्रिकेट सामना आयोजित करणे राष्ट्रीय प्रतिष्ठा आणि जनभावनेला धक्का देणारे ठरते. त्यांच्या म्हणण्यानुसार, क्रिकेटला राष्ट्रीय हित, नागरिकांचे जीवन किंवा सशस्त्र दलांच्या बलिदानापेक्षा प्राधान्य देता येणार नाही.
याचिकेत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा, २०२५ ची काटेकोर अंमलबजावणी करण्यासाठीही सर्वोच्च न्यायालयाने निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…