देश

पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल, १५ डिसेंबरपर्यंत करून घ्या ‘हे’ काम

नवी दिल्ली : पीएम किसान योजनेच्या नियमांमध्ये बदल करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना ई-केवायसी (eKYC) करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पोर्टलवर दिलेल्या माहितीनुसार किंवा जवळच्या सीएससी (CSC) केंद्राला भेट देऊन आधार आधारित ओटीपी (OTP) प्रमाणीकरण थेट करू शकता. तुम्ही घरबसल्या ऑनलाइन पद्धतीने मोबाईल, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरद्वारे ई-केवायसी प्रक्रिया करू शकता.

१५ डिसेंबरपर्यंत पीएम किसान योजनेंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यात १० व्या हप्त्याचे २००० रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात येतील. जर तुम्ही पीएम किसान योजनेअंतर्गत नोंदणी दरम्यान ई-केवायसी किंवा ई-केवायई (eKYE) केले नसेल, तर तुमचे हप्त्याचे पैसे थांबू शकतात. ईकेवायसी करण्यासाठी तुम्हाला पीएम किसान योजनेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी लागेल.

ऑनलाइन ईकेवायसी कसे करावे?

  1. https://pmkisan.gov.in/ पोर्टलवर जा.
  2. त्यानंतर फार्मर कॉर्नरवर जा.
  3. येथे ई-केवायसी (eKYC) च्या नवीन पर्यायावर क्लिक करावे लागेल. त्यानंतर एक नवीन पान उघडेल.
  4. त्यानंतर आधारशी लिंक केलेला मोबाईल नंबर टाका आणि नंतर ओटीपी टाका.
  5. जर सर्व प्रक्रिया पूर्ण झाली, तर ई-केवायसी (eKYC) पूर्ण होईल. प्रक्रिया पूर्ण झाली नाही, तर स्क्रीनवर इनव्हॅलिड (Invalid) लिहिलेले दिसेल.

ई-केवायसी (eKYC) प्रक्रिया इनव्हॅलिड झाल्यास तुमचे पैसे अडकून पडू शकतात. जे तुम्ही जवळच्या आधार सेवा केंद्राला भेट देऊन दुरुस्त करू शकता. केंद्र सरकार यावर्षीचा पीएम किसानचा शेवटचा हप्ता देणार आहे. या योजनेत शेतकऱ्यांना दरवर्षी ६००० रुपये दिले जातात.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

2 महिने ago