देश

पाकिस्तान्यांचे व्हिसा रद्द! सर्वांना शोधून शोधून बाहेर काढा, अमित शहांच्या सर्व मुख्यमंत्र्यांना सूचना

नवी दिल्ली : 22 एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने ठोस आणि कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. या भीषण हल्ल्यात 26 पर्यटकांचा मृत्यू झाला होता तर 17 जण जखमी झाले होते. या घटनेनंतर केंद्र सरकारने तातडीने ऍक्शन मोड घेत काही महत्वाचे निर्णय घेतले आहेत.

केंद्रीय गृह मंत्रालयाने पाकिस्तानशी संबंधित सर्व व्हिसा तत्काळ रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच, गृहमंत्री अमित शहा यांनी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून त्यांच्या राज्यांमध्ये असलेल्या पाकिस्तानी नागरिकांना लवकरात लवकर देशाबाहेर काढण्याच्या सूचना दिल्या आहेत. वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर झालेल्या उच्चस्तरीय बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला.

याशिवाय, भारताने भारत-पाकिस्तानमधील सिंधू पाणी करार स्थगित करण्याचाही मोठा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. 1960 पासून लागू असलेला हा करार पाकिस्तानसाठी पाण्याचा मुख्य स्त्रोत मानला जातो. पाकिस्तानची 21 कोटींपेक्षा अधिक लोकसंख्या सिंधू आणि तिच्या उपनद्यांवर अवलंबून आहे.

अधिक कठोर पावले उचलताना केंद्र सरकारने अटारी सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतात आलेल्या पाकिस्तानी नागरिकांना 1 मेपर्यंत या मार्गाने परत जाण्याची अंतिम मुदत दिली आहे. भारतातील पाकिस्तानी उच्चायुक्तालयात तैनात असलेल्या संरक्षण सल्लागारांना देखील एका आठवड्याच्या आत देश सोडण्याचे आदेश देण्यात आले आहेत. भारत आणि पाकिस्तानच्या उच्चायोगांमधील कर्मचाऱ्यांची संख्या देखील कमी करण्यात आली असून ती 50 वरून 30 इतकी करण्यात आली आहे. केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे की देशाच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड केली जाणार नाही.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Share
Published by
थोडक्यात घडामोडी टीम

Recent Posts

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

1 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago