Pakistan is looking for new ways to send terrorists to India
भारताविरूद्ध पाकिस्तानच्या कुरापती नेहमी सुरु असतात. दहशतवाद्यांना भारतात आणण्यासाठी पाकिस्तान आता जम्मू-काश्मीर आणि पंजाब व्यतिरिक्त आता राजस्थान आणि गुजरातमधून घुसखोरी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सीमा सुरक्षा दलाने (बीएसएफ) जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार अलिकडच्या काळात घुसखोरीच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे.
BSF च्या अधिकाऱ्यांनी दावा केला आहे कि, दहशतवाद्यांना भारतात पाठविण्याकरिता पाकिस्तान वेगवेगळ्या मार्गांचा शोध घेत आहे. आमचे सैनिक पूर्णपणे सतर्क आहेत आणि 24 तास सीमेवर निगराणी करत आहेत. ते म्हणाले की, बीएसएफ आपल्या जवानांची पोझिशन इंटेलिजन्स इनपुटनुसार सतत अपडेट करत राहतात.
यावर्षी नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापर्यंत 11 घुसखोरीच्या घटना घडल्याचे बीएसएफच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. जम्मू, काश्मीर, पंजाब, राजस्थान आणि गुजरातला लागून असलेल्या सीमेवर ही घुसखोरी करण्यात आली. यावर्षी जम्मू आणि पंजाब सीमेवरुन सर्वाधिक घुसखोरीच्या घटना घडल्या आहेत.
नोव्हेंबर महिन्यात जम्मू-काश्मीरच्या सांबा सेक्टरमधील आंतरराष्ट्रीय सीमेवर बीएसएफने दीडशे मीटर लांबीचा बोगदा शोधून काढला होता आणि एका घुसखोरालाही ठार केले होते. बीएसएफचे IG एनएस जामवाल म्हणाले होते की आंतरराष्ट्रीय सीमेवर हा बोगदा शोधल्यामुळे हे स्पष्ट होते की पाकिस्तानी सैन्य दहशतवाद्यांना मदत करत आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…