New guidelines for social media and OTT platforms
केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी गुरुवारी सोशल मीडिया, ओटीटी प्लॅटफॉर्म आणि न्यूज वेबसाइट्ससाठी नवीन मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या. ते म्हणाले की सोशल मीडियाच्या गैरवापराविरोधात तक्रारींचे निराकरण ठराविक वेळेत करण्यासाठी कंपन्यांना विशिष्ट यंत्रणा बनवावी लागेल.
ग्राहकांच्या तक्रारी ऐकण्यासाठी सोशल मीडिया कंपन्यांना एका अधिकाऱ्याची नेमणूक करावी लागेल आणि त्याचे नावही सांगावे लागेल. या अधिका्याला 15 दिवसांच्या आत तक्रारीचे निवारण करावे लागेल. आपण एखाद्या सोशल मीडिया युझर्सचे कन्टेन्ट काढू इच्छित असल्यास, त्याचे कारण सांगावे लागेल. प्रथम कोणी चुकीचा कन्टेन्ट टाकला आहे, हे देखील सांगावे लागेल.
रविशंकर प्रसाद म्हणाले, “आमच्याकडे तक्रार आली होती की सोशल मीडिया हे गुन्हेगार, दहशतवादी, हिंसाचार करणाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे व्यासपीठ बनले आहे. भारतात व्हॉट्सअॅपचे 50 कोटी वापरकर्ते आहेत. फेसबुकचे 41 कोटी तर इंस्टाग्राम वापरकर्त्यांची संख्या 21 कोटी आणि ट्विटरचे दिड कोटी वापरकर्ते आहेत. या सोशल मीडियाचा दुरुपयोग आणि फेक बातम्यांच्या तक्रारी आल्या आहेत. ही चिंतेची बाब होती. त्यामुळे सरकारने अशा प्लॅटफॉर्मसाठी गाईडलाईन्स तयार करण्याचा निर्णय घेतला.”
सोशल मीडियासाठी तयार केलेल्या गाईडलाईन्स :
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…