Maharashtra Roadways bus going from Indore to Pune fell into river, 12 people died
मध्य प्रदेश : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातून एका वेदनादायक अपघाताची बातमी आली आहे. येथे प्रवाशांनी भरलेली बस संजय सेतू पूलावरून नदीत पडली. या अपघातात 12 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 15 जणांना वाचवण्यात यश आल्याचे सांगण्यात येत आहे. ही बस इंदूरहून पुण्याकडे येत होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी बस नर्मदा नदीत पडली आहे. इंदूरहून महाराष्ट्राकडे पुण्यात जाणारी प्रवासी बस खलघाट संजय सेतू पुलावर संतुलन बिघडल्याने खाली पडली. सध्या 12 प्रवाशांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. त्याचबरोबर जखमींना रुग्णवाहिकेच्या मदतीने धामनोदच्या शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आले आहे. घटनास्थळी धामनोद पोलिस आणि खलटाका पोलिसांचा बंदोबस्त आहे, गोताखोर बचावकार्य करत आहेत. एनडीआरएफची टीमही मदतकार्यासाठी घटनास्थळी पोहोचली आहे.
मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी सकाळी झालेल्या बस अपघाताची दखल घेतली आहे. बस नदीत कोसळल्याची माहिती मिळताच प्रशासनाला लवकरात लवकर पोहोचण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. क्रेनच्या साहाय्याने बस बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत. बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे. जिल्हा प्रशासन घटनास्थळी दाखल झाले असून मुख्यमंत्र्यांनी एसडीआरएफ पाठवण्याच्या सूचना दिल्या आहेत, त्याशिवाय घटनास्थळी आवश्यक साधनसामग्री पाठवून जखमींवर योग्य उपचार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मुख्यमंत्री खरगोन, इंदूर जिल्हा प्रशासनाच्या सतत संपर्कात आहेत.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…