lakhimpur kheri viral video appears to show farmers being run over by suv
लखनौ : उत्तर प्रदेशातील लखीमपूर खेरी या ठिकाणी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांचा मुलगा आशिष मिश्राने गाडीने चिरडले होते. यामध्ये आतापर्यंत नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणातील एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक SUV गाडी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना चिरडत पुढे निघून जाते. पण हा व्हिडीओ लखीमपूरमधील आहे की नाही याची सत्यता उत्तर प्रदेश पोलिसांनी अद्याप तपासली नाही.
केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय मिश्रा हे एका कार्यक्रमानिमित्ताने लखीमपूर खेरी या ठिकाणी येणार होते. पण त्याअगोदर शेतकऱ्यांनी केंद्रीय कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन सुरु केलं. ज्यावेळी केंद्रीय मंत्र्यांचा गाडीचा ताफा या ठिकाणी आला त्यावेळी मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा याने आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना कारने चिरडण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात नऊ शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. ही SUV केंद्रीय मंत्री अजय मिश्रा यांच्या ताफ्यातील होती. या SUV मध्ये मंत्र्यांचा मुलगा आशिष मिश्रा हाच बसला होता असं प्रत्यक्षदर्शी शेतकऱ्यांनी सांगितलं आहे.
लखीमपूर खीरी येथे दोन दिवस झालेल्या गोंधळानंतर शेतकरी आणि प्रशासनाने तोडगा काढला आहे. यानुसार, 4 मृत शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना 45 -45 लाख रुपये नुकसान भरपाई मिळणार आहे. जखमी शेतकऱ्यांना 10 लाख रुपये नुकसानभरपाई दिली जाईल. उच्च न्यायालयाच्या सेवानिवृत्त जजकडून या संपूर्ण प्रकरणाची कायदेशीर चौकशी केली जाईल. मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल. तसेच आठ दिवसाच्या आत आरोपींना अटक करण्यात येईल, असं आश्वासन सरकारकडून देण्यात आलं आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…