Gold
आसाम सरकारने राज्यातील मुलींच्या लग्नात एक तोळं सोनं देण्याचा निर्णय घेतला आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून आई-वडिलांना आपल्या मुलीच्या लग्नात मोफत एक तोळं सोनं देण्यात येणार आहे. ‘अरुंधती गोल्ड योजने’ च्या माध्यमातून राज्यातील मुलींच्या लग्नात 10 ग्रॅमचा सोन्याचा शिक्का मोफत भेट म्हणून देण्याचा निर्णय आसाम राज्य सरकारनं घेतला आहे.
अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून आसाम सरकार राज्यातील ज्या परिवारांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखांपेक्षा कमी आहे अशा परिवारांना 10 ग्रॅम सोन्याचा शिक्का देणार आहे. परिवारातील पहिल्या दोन अपत्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे. अरुंधती गोल्ड योजनेच्या माध्यमातून विवाहाच्या नोंदणीकरणानंतर प्रत्येक विवाह झालेली मुलगी राज्य सरकारकडून देण्यात येणाऱ्या या 10 ग्रॅम सोन्यच्या शिक्क्याचा लाभ घेऊ शकते. या योजनेमुळे राज्यातील मुलींना काही प्रमाणात आर्थिक सुरक्षा मिळण्याची आशा राज्य सरकारनं व्यक्त केली आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी स्पेशल मॅरेज अॅक्ट,1954 या कायद्यानुसार नोंदणी करावी लागणार आहे. या नोंदणीच्या दिवशीच संबंधित मुलगी अरुंधती गोल्ड योजनेअंतर्गत लाभ मिळवण्यासाठी अर्ज करु शकते. यासाठी मुलीचं वय किमान 18 वर्षे तर मुलाचं वय किमान 21 वर्षे असायला हवं.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…