Former Union Minister Ram Vilas Paswan's death suspicious, demands judicial inquiry
माजी केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. हिंदुस्तानी आवाम मोर्चाचे राष्ट्रीय प्रवक्ते डॉ. दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी करण्याची मागणी केली आहे.
डॉ. दानिश रिझवान यांनी या प्रकरणी लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. रामविलास पासवान यांच्याशी संबंधित कोणत्या गोष्टी लपवल्या जात आहेत हे देशाला जाणून घ्यायचे आहे, असे दानिश रिझवान यांनी म्हटले आहे. दानिश रिझवान यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रात अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. रामविलास पासवान यांच्या मृत्यूनंतर लोक जनशक्ती पक्षाचे अध्यक्ष चिराग पासवान यांचं हसणं, वागणं याकडे बघता त्यांच्याकडे संशयाची सुई जाते, असे देखील रिझवान यांनी म्हटले आहे.
केंद्रीय मंत्री असलेले रामविलास पासवान हे रुग्णालयात उपचार घेत असताना कोणाच्या सांगण्यावरून रुग्णालयाने मेडिकल बुलेटीन जारी केले नाही, असा प्रश्न देखील दानिश रिझवान यांनी उपस्थित केला आहे.
रामविलास पासवान यांच्या मृत्यूबाबत असे अनेक प्रश्न आहेत, ज्यांची उत्तरे रामविलास पासवान यांच्या नातेवाईकांबरोबरच त्यांचे समर्थकही जाणू इच्छितात असे हिंदुस्तानी आवामी मोर्चाने पासवान यांच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित करताना म्हटले आहे. त्यामुळे रामविलास पासवान यांच्या निधनाची न्यायिक चौकशी व्हायला हवी, असे हिंदुस्तानी आवामी मोर्चाने म्हटले आहे.
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…