माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलचा(RJD) राजीनामा दिला होता.
रघुवंश प्रसाद सिंह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिंह यांना आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज (१३ सप्टेंबर) त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.
रघुवंश प्रसाद यांच्या निधनाचं वृत्त समजताच बिहारमध्ये राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जात आहे. रघुवंश प्रसाद मागील ३२ वर्षांपासून राजदमध्ये होते. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी आयसीयूतून पक्षाचा राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद यांचं राजदमध्ये चांगलं वजन होतं. लालू प्रसाद यादव हे सुद्धा रघुवंश यांनी दिलेले सल्ले ऐकायचे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…