देश

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं निधन

माजी केंद्रीय मंत्री रघुवंश प्रसाद सिंह यांचं आज निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. काही दिवसांपासून आजारी असल्यामुळे त्यांच्यावर दिल्लीतील एम्स रुग्णालयात उपचार सुरू होते. रघुवंश प्रसाद सिंह यांनी गुरुवारी राष्ट्रीय जनता दलचा(RJD) राजीनामा दिला होता.

रघुवंश प्रसाद सिंह यांची काही दिवसांपूर्वी प्रकृती बिघडली होती. त्यानंतर त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. सिंह यांना आयसीयू वार्डमध्ये दाखल करण्यात आलं होतं. दोन दिवसांपूर्वी प्रकृती बिघडल्यानं त्यांना व्हेटिंलेटरवर ठेवण्यात आलं होतं. आज (१३ सप्टेंबर) त्यांचं उपचारादरम्यान निधन झालं.

रघुवंश प्रसाद यांच्या निधनाचं वृत्त समजताच बिहारमध्ये राजकीय वर्तुळातून दुःख व्यक्त केलं जात आहे. रघुवंश प्रसाद मागील ३२ वर्षांपासून राजदमध्ये होते. बिहार विधानसभा निवडणूक तोंडावर आलेली असतानाच त्यांनी आयसीयूतून पक्षाचा राजीनामा दिला होता. रघुवंश प्रसाद यांचं राजदमध्ये चांगलं वजन होतं. लालू प्रसाद यादव हे सुद्धा रघुवंश यांनी दिलेले सल्ले ऐकायचे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago