flight emergency landing mumbai nagpur paitient
मुंबई : नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या वैद्यकीय विमानात (एअर ऍम्ब्युलन्स) झालेल्या बिघाडानंतर प्रचंड गोंधळ झाला, पण नंतर हे विमान सुखरुप मुंबईत दाखल झाले आहे. विमानात गडबड झाल्याचे लक्षात येताच ते मुंबईकडे वळविण्यात आले. यासाठी संपूर्ण इमर्जन्सीची घोषणा करण्यात आली. क्रॅश लँडिंगची भीती निर्माण झाली होती, पण अखेर या विमानाला सुरक्षितपणे उतरवण्यात यश मिळाले.
या विमानात एक रुग्ण, दोन पॅरामेडिकल कर्मचारी आणि दोन क्रू मेम्बर होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान नागपूरहून उड्डाण करत होते, तेव्हा त्याचा एक टायर निसटला आणि तो जमिनीवर पडला. अशा परिस्थितीत त्या विमानाचे क्रॅश लँडिंग होण्याची शक्यता आहे. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उड्डाणातील उपस्थित वैमानिकांनी समजूतदारपणा दाखविला आणि बेली लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. यानंतर लँडिंगसाठी मुंबई विमानतळाला सतर्क करण्यात आले. विमानाच्या बेली लँडिंगसाठी धावपट्टीवर फेस पसरवण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या प्रवक्त्याने विमानाच्या सुरक्षित लँडिंगची पुष्टी केली आहे.
जर वेळेत बेली लँडिंग केली नसती तर मोठा अपघातही होऊ सहकला असता. पण वैमानिकाने समयसूचकता दाखवत योग्य वेळी योग्य निर्णय घेतला आणि सर्व प्रवाशांना सुखरुप मुंबईत दाखल करण्यात आले. विमानातील रुग्णास मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. फ्लाइटमधील सर्व प्रवासी पूर्णपणे सुरक्षित असल्याची माहिती मिळाली आहे.
सुरक्षित लँडिंगसाठी धावपट्टीवर ‘फोम’ पसरवण्यात आला होता. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. विमानही अपघातातून बचावले असून सर्व प्रवासीही सुखरुप आहेत. पण या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे. या घटनेमुळे अनेक प्रश्न उद्भवले आहेत. नक्की कोणत्या स्तरावर दुर्लक्ष झाले, ही बाब तपासण्यासारखी आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…