Encounter specialist Dayanand Nayak
मुंबई : एन्काउंटर स्पेशालिस्ट व सध्या मुंबई शहर दहशतवाद विरोधी पथकात सेवेत असलेले पोलीस निरीक्षक दयानंद नायक यांची थेट गोंदियात बदली करण्यात आली आहे. प्रशासकीय कारणास्तव ही बदली करण्यात येत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. दया नायक हे सध्या दहशतवाद विरोधी पथक मुंबई येथे सेवेत आहेत. त्यांची तिथून गोंदिया जिल्हा जात प्रमाणपत्र समिती येथे बदली करण्यात येत आहे.
दरम्यान, दया नायक यांच्या बदलीमागे प्रशासकीय कारण देण्यात आले असले तरी त्यावर उलटसुलट चर्चा सुरू झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पोलीस दलात मोठ्या प्रमाणात फेरबदल सुरू आहेत. अँटिलिया स्फोटकं प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरण पुढे आल्यानंतर बदल्यांचा धडाकाच लावण्यात आला. त्यातच आता दया नायक यांची बदली करण्यात आल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
दया नायक यांनी गेल्या वर्षभरात अनेक हाय प्रोफाइल प्रकरणं हाताळली आहेत. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत यांना धमक्या आल्याची चर्चा होती. त्याच्या तपासाचं कामसुद्धा दया नायक यांच्याकडेच होते. राज्यातील या बड्या नेत्यांना धमकी आल्याने त्याचा तपास एटीएसतर्फे दया नायक करत होते. या तपासासाठी त्यांना मुंबई बाहेर आणि राज्याच्या बाहेरही जावं लागलं होतं. मनसुख हिरन हत्येचा तपास करण्यासाठी ज्या टीम नेमल्या होत्या. त्यातील जूहू एटीएसच्या टीमचे इन्चार्ज म्हणून दया नायक काम करत होते.
कोण आहेत दया नायक ?
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…