देश

आता बोला! माजी मुख्यमंत्री म्हणतात, ‘कोरोना विषाणूही एक जीव, त्यालाही जगण्याचा अधिकार’

नवी दिल्ली : कोरोना संसर्गाने देशात भयावह परिस्थिती निर्माण केली आहे. आतापर्यंत देशात कोरोनामुळे अडीच लाखांहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र, अशा परिस्थिती भाजप नेते आणि उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी एक अजब दावा केला आहे. त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत त्रिवेंद्र सिंह रावत ‘कोरोना विषाणूही एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार आहे’, असं म्हणताना दिसत आहेत.

त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले कि, “पाहिलं तर कोरोना विषाणूही एक प्राणी आहे. आपणही प्राणी आहोत. परंतु, आपण मनुष्य स्वत:ला सर्वात बुद्धिमान प्राणी समजतो. कोरोना विषाणूची जगण्याची इच्छा आहे आणि त्याला जगण्याचा अधिकार आहे. आपण त्याच्या मागे लागलो आहोत. त्यामुळे तो स्वतःला वाचवण्यासाठी स्वत:च रुप बदलत आहे.” दरम्यान, त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या व्हिडिओवर सोशल मीडियातून अनेक प्रतिक्रियाही उमटत असून त्यांना ट्रोल केलं जातं आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago