Big revelation about the death of Dalit girls in Unnao
उत्तर प्रदेशमधील उन्नाव येथे दलित मुलींच्या मृत्यूचा पोलिसांनी खुलासा केला आहे. दोन आरोपींना अटक करण्यात आली असून पोलिसांनी सांगितले की, ही घटना एकतर्फी प्रेमातून घडली आहे. आरोपीची या तिघींपैकी एका दलित मुलीशी ओळख होती. त्याने तिच्यासमोर आपले प्रेम व्यक्त केले होते. परंतु, तिने नकार दिल्यानंतर या मुलाने पाण्याच्या बाटलीत कीटकनाशक मिसळले आणि ते पाणी मुलीला प्यायला दिले. मात्र अजाणतेपणी दुसऱ्या दोन्ही मुलींनी देखील तेच पाणी प्यायले.
१7 फेब्रुवारीला काजल, कोमल आणि रोशनी या तीन मुली बबुरहा गावात शेतामध्ये संशयास्पद परिस्थितीत आढळल्या होत्या. त्यांच्या तोंडातून फेस बाहेर येत होता. काजल आणि कोमल यांचा मृत्यू झाला तर रोशनीवर कानपूर येथे उपचार सुरू आहेत. तिची प्रकृती चिंताजनक आहे.
फॉरेन्सिक टीमला तपासादरम्यान घटनास्थळावरून बाटल्या आणि चिप्सची पाकिटं मिळाली होती. या पुराव्यांवरून पोलिस आरोपीपर्यंत पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी दोन तरुण शेतातून पळताना दिसले. यानंतर त्यांचा शोध घेण्यात आला आणि त्यानंतर या तरुणांना अटक करण्यात आली. विनय हा या प्रकरणातील मुख्य आरोपी आहे. तर दुसरा आरोपी अल्पवयीन आहे. विनय एका मुलीवर प्रेम करत होता. त्याने मुलीकडे मोबाईल नंबर मागितला, पण मुलीने त्याला नकार दिला. त्यानंतर विनयने तिला जिवे मारण्याचा कट रचला.
मुलीच्या कुटूंबाने या प्रकरणात 18 तासांनंतर पोलिसांत तक्रार दिली. या प्रकरणाचा बलात्कार आणि ऑनर किलिंगच्या बाजूने देखील तपास करण्यात आला. तथापि, यात कोणत्याही प्रकारच्या जखमा किंवा लैंगिक छळ झाल्याच्या खुणा नव्हत्या. पोस्टमार्टम अहवालात विषबाधा झाल्याची खात्री झाली होती.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…