entire family committed suicide, A suicide note has been found
मध्य प्रदेश : इंदोरमध्ये 15 वर्षीय मुलीने मोहरमच्या दिवशी गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी तिने आईला प्रश्न विचारला होता की इमाम हुसेन या दिवशी शहीद झाले का? आज जे मरण पावतात ते शहीद होतात का? ते स्वर्गात जातात का? त्यावर आईने उत्तर दिले- होय. काही वेळानंतर मुलीने गळफास घेतला. कुटुंबातील सदस्यांनी तिला खाली उतरवून रुग्णालयात नेले, मात्र तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.
मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना इंदोर शहरातील रावजी बाजार परिसरातील चंपा बागेत असलेल्या हथीपाला येथे घडली. राबिया आपल्या संपूर्ण कुटुंबासह शुक्रवारी सायंकाळी उशिरा मोहरमचा उपवास सोडण्यासाठी बसली होती. आईने आपल्या मुलीच्या आवडीची खीरही बनवली होती. त्यावेळी तिने विचारलेल्या एका प्रश्नाने तिचा जीव घेतला. या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
काही दिवसांपूर्वी राबियाचा अकरावीत प्रवेश घेण्यात आला होता. दोन दिवसांपूर्वी तिला अकरावीची पुस्तके देण्यात आली होती. ती खूप आनंदी होती, मग तिने असे पाऊल का उचलले? हे कोणालाही समजले नाही. कुटुंबातील सदस्यांनी सांगितले की काही वर्षांपूर्वी तिच्या शाळेची सहल राऊ सर्कलजवळ नखराली धानी येथे गेली होती. तिथे राबियाच्या मैत्रिणीचा झुल्यावरून पडून मृत्यू झाला होता. त्यानंतर राबिया काही भ्रामक गोष्टी बोलू लागली होती. ती नेहमी म्हणायची की जीवन आणि मृत्यू म्हणजे काय? आपण कधीही मरू शकतो. अशा गोष्टींवर कुटुंबीय तिला अनेक वेळा खडसवायचे, पण तिच्या मैत्रिणीच्या मृत्यूनंतर ती मानसिकदृष्ट्या सावरू शकली नव्हती.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…