देश

राम मंदिरासाठी २८ वर्षांपासून उपवास

रामललाच्या जन्मस्थानी प्रभू रामचंद्रांचे भव्य मंदिर उभे राहणार आहे. अयोध्येत उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिर निर्माणाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे. मंदिर उभे राहावे, त्यासाठी राम भक्तांनी शेकडो वर्ष संघर्ष केला आहे. अयोध्येत राम मंदिर उभे रहावे, यासाठी पडद्यामागे अनेकांनी हातभार लावला आहे. समाजात अशा काही व्यक्ती आहेत, ज्यांनी पडद्यामागे राहून राम मंदिराच्या निर्माणासाठी साधना केली आहे.

मध्य प्रदेशच्या जबलपूरमध्ये राहणाऱ्या ८२ वर्षीय उर्मिला चतुर्वेदी अशाच व्यक्तींपैकी एक आहेत. राम मंदिरासाठी उर्मिला यांनी गेल्या २८ वर्षांपासून उपवास ठेवला आहे. ६ डिसेंबर १९९२ रोजी अयोध्येत वादग्रस्त वास्तू जमीनदोस्त करण्यात आली, त्यावेळी उर्मिला यांनी राम मंदिराचे निर्माण होत नाही, तो पर्यंत अन्नगहण करणार नाही असा संकल्प केला. उर्मिला चतुर्वेदी यांचे वय तेव्हा ५४ वर्ष होते. न्यूज १८ हिंदीने हे वृत्त दिले आहे.

२८ वर्षात उर्मिला यांनी राम नामाचा जप करताना अन्नाचा एक कणही ग्रहण केलेला नाही. फक्त त्या फळांचे सेवन करुन साधनेमध्ये व्यस्त असतात. उद्या पाच ऑगस्टला २८ वर्षानंतर भूमिपूजनाने त्यांचा संकल्प सिद्धीस जाणार आहे. राम मंदिराच्या भूमिपूजनाची तारीख जाहीर झाल्यापासून उर्मिला प्रचंड आनंदात आहेत. अयोध्येत रामललाच्या दर्शनानंतर शरयू नदीच्या किनाऱ्यावर २८ वर्षांपासून सुरु असलेला उपवास आपण सोडणार आहोत, असे उर्मिला चतुर्वेदी यांनी सांगितले.

उद्या जेव्हा अयोध्येत भव्य राम मंदिर निर्माणासाठी भूमिपूजन होईल, त्यावेळी उर्मिला दिवसभर आपल्याघरी राम नापाचा जप करतील. उर्मिला यांची अयोध्येमध्ये जाण्याची तीव्र इच्छा आहे. पण करोना संक्रमणाचा धोका आणि डॉक्टरच्या परवानगीनंतरच त्यांची ही इच्छा पूर्ण होऊ शकते. उर्मिला व त्यांच्या कुटुंबातील सर्वजण आज आनंदात आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

4 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

4 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

4 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

4 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

2 महिने ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

2 महिने ago