अभिनेता सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरणी मुंबई पोलीस आर्थिक दृष्टीकोनातून तपास करत नसल्याचा आरोप बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांनी केला आहे. सुशांतच्या वडिलांनी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात पाटणा पोलिसांत तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून रियाविरोधात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांनी रियावर पैसे उकळल्याचाही आरोप केला आहे.
“गेल्या चार वर्षांत सुशांतच्या बँक खात्यात ५५ कोटी रुपये जमा केले गेले आणि आश्चर्यकारकरित्या ५३ कोटी खात्यातून काढले गेले. एका वर्षात १७ कोटी रुपये त्याच्या खात्यात जमा केले गेले. त्यापैकी १५ कोटी रुपये काढले गेले. विशेष म्हणजे त्याने घर घेतलं नाही, गुंतवणूक केली नाही, मग इतके पैसे कुठे गेले, हा तपासासाठी महत्त्वपूर्ण विषय नाही का? आम्ही शांत बसणार नाही. आम्ही मुंबई पोलिसांना याबद्दल प्रश्न विचारणार”, असं बिहारचे पोलीस महासंचालक म्हणाले.पाटणाचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे सुशांतच्या मृत्यू प्रकरणी तपासासाठी मुंबईत दाखल झाल्यानंतर त्यांना सक्तीने क्वारंटाइन करण्यात आलं. याविषयी ते म्हणाले, “सुशांत प्रकरणात मिळवलेले पुरावे आणि शवविच्छेदन अहवाल विनय तिवारी यांच्याकडे सोपवण्याऐवजी त्यांनी अधिकाऱ्याला क्वारंटाइन केलंय. मी कोणत्याही राज्याच्या पोलिसांकडून अशाप्रकारची वागणूक पाहिली नाही. जर मुंबई पोलिसांचा प्रामाणिक दृष्टीकोन असेल तर त्यांनी आम्हाला तपासाची परवानगी द्यायला हवी आणि सहकार्य करायला हवं,” असंही बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे म्हणाले.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…