महाराष्ट्र

राज्यातील ‘या’ जिल्ह्यांना तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा, नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील काही भागात पुढील 3 दिवसांत उष्णतेची ते तीव्र उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून ही माहिती देण्यात आली आहे. तसेच नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे.

उत्तर पच्छिम भारताकडून कोरडी आणि गरम हवा वाहत असल्यामुळे समुद्रावरून वाहणारे वारे वाहायला उशीर होत आहे. सध्या आकाशदेखील निरभ्र आहे. हवामानाची ही परिस्थिती लक्षात घेता रायगड, ठाणे, पालघर, मुंबई, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या कोकणातील किनारी जिल्ह्यांना १४, १५ आणि १६ मार्च रोजी उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. हवामान विभागाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जसे उन्हात जाणे टाळावे, सैल सुती कपडे वापरावे आणि भरपूर पाणी प्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

14 व 15 मार्चला मुंबई,ठाण्यासह संपूर्ण उत्तर कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा.
14 मार्च दक्षिण कोकणात तीव्र उष्णतेच्या लाटेचा इशारा व 15 मार्चला उष्णतेच्या लाटेचा इशारा.
16 मार्च संपूर्ण कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 महिना ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 महिना ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 महिना ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

1 महिना ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

1 महिना ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago