सोलापूर : प्रशासनाच्या वतीने घालून दिलेल्या लॉकडाऊनमुळे देखील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. मात्र सध्या शेतकऱ्यांना कांद्याला चांगला भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान होते. मात्र अचानकपणे कांदा निर्यातीवर केंद्र सरकारने बंदी घातल्याने देशभरातील कांद्याचे भाव कमी होणार आहेत. सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
केंद्र सरकारने घेतलेला कांदा निर्यात बंदीचा निर्णय मागे घेऊन, शेतकऱ्यांचे नुकसान थांबावे म्हणून एका शेतकरी पुत्राने राज्यापालांची भेटण्यासाठी वेळ मागितली आहे. हे वेळ त्याने मेल करून मागितली आहे काय म्हटलं आहे या मेल मध्ये, महोदय, मी विरेश आंधळकर, रा – सौंदरे, ता – बार्शी, जि – सोलापूर. मी एक पदवीधर असून माझी वडिलोपार्जित शेती आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या संकटामध्ये गावी परतावे लागले आहे. ही केवळ माझी एकटयाची परिस्थिती नसून राज्यातील बहुतांश शेतकऱ्यांची शहरामध्ये काम करणारी शिकणारी मुले आता गावाकडे परतलेली आहेत.
The farmer’s son asked for time to meet the governor
केंद्र आणि राज्य सरकारचा दुवा असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना भेटण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील विरेश आंधळकर या युवा शेतकऱ्याने इमेलद्वारे वेळ मागितली. शेतकरी पुत्राला कांदा उत्पादकांवर अन्याय होत असताना भेटीसाठी वेळ देणार का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे
Share this :
थोडक्यात घडामोडी टीम
कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी