मुंबईत आज मध्यरात्रीपासून पुन्हा एकदा जमावबंदी
मुंबई : आता पुन्हा एकदा मुंबईकरांवर निर्बंध येणार आहेत. मुंबईत आज मध्यरात्रीपासून जमावंबदी लागू करण्यात येणार आहे. ही जमावबंदी ३० सप्टेंबरपर्यंत लागू असणार आहे. याविषयी मुंबई पोलीस आयुक्तालयाकडून परिपत्रक जारी करण्यात आलं आहे. मात्र असं असलं तरीही कोणत्याही प्रकारचा लॉकडाऊन यावेळी करण्यात आलेला नाही. मात्र, यावेळी नागरिकांना कुठेही गर्दी करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्रवासाची मुभा असणार आहे. मात्र, यावेळी त्यांना सोशल डिस्टन्सिंग आणि इतर प्रोटोकॉलचे पालन करावं लागणार आहे. त्याशिवाय मास्क देखील अनिवार्य असणार आहे. अनलॉक दरम्यान, राज्यात सर्व व्यवहार रुळावर आणण्याचे प्रयत्न केले जात आहेत. मात्र, पुन्हा एकदा रुग्णांची संख्या वाढत असल्याने आता पुन्हा कलम १४४ लागू करण्यात आलं आहे. जेणेकरुन अनावश्यक गर्दी टाळता येईल.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…