ठाणे

ठाण्यात बर्ड फ्लूने 100 कोंबड्यांचा मृत्यू, 25000 कोंबड्या नष्ट करण्यात येणार

ठाणे : ठाण्यातील शहापूर तालुक्यातील वेहळोली गावातील एका पोल्ट्री फार्ममध्ये सुमारे 100 कोंबड्यांचा आकस्मिक मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. ठाणे डीएम आणि जिल्हाधिकारी राजेश जे. नार्वेकर यांनी सांगितले की बर्ड फ्लूचा धोका लक्षात घेता त्यांचे नमुने पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवण्यात आले. दरम्यान, कोंबड्यांचा मृत्यू हा बर्ड फ्लूच्या संसर्गाने झाल्याचे तपासणी अहवालात स्पष्ट झाले आहे.

संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हा पशुसंवर्धन विभागाला देण्यात आले आहेत. प्रशासनाने खबरदारीची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. आगामी काही दिवसांत पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील जवळपास २५ हजार कोंबड्या शास्त्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात येणार आहेत, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. बर्ड फ्लूचा प्रादूर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात येत असून, घाबरण्याचे काहीही कारण नाही, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

1 आठवडा ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

1 आठवडा ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

1 आठवडा ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago