Shiv Sena-NCP discussion or dispute?
सचिन वाझे यांना झालेली अटक व त्यांच्या निलंबनानंतर महाविकास आघाडीमध्येही ठिणगी पडल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी काही वेळापूर्वीच ‘वर्षा’ निवासस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली.
विरोधकांनी विधानसभेत मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात सचिन वाझे यांचा हात असल्याचा आरोप करत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली होती. मात्र, महाविकास आघाडी सरकारनं वाझे यांची बदली करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अँटिलिया स्फोटकं प्रकरणात ‘NIA’ नं सचिन वाझे यांना अटक केली. तसंच त्यानंतर त्यांना दुसऱ्यांदा निलंबित देखील करण्यात आलं आहे.
शिवसेनेने निलंबित असलेल्या वाझे यांना पोलीस सेवेत परत घेतलेच कसे, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. तर गृहखातं अनिल देशमुख यांच्याकडं असल्यानं शिवसेनेकडून अनिल देशमुख यांच्यावर ठपका ठेवला जात आहे. त्यांना हे संपूर्ण प्रकरण नीट हाताळता आलं नाही, त्यामुळं त्यांनी राजीनामा द्यावा, असं शिवसेनेचं म्हणणं असल्याची माहिती मिळत आहे. मात्र, मनसुख हिरेन प्रकरणात मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी वाझे यांना पाठीशी घातलं, त्यामुळं परमबीर सिंह यांना पदावरून दूर करण्याची मागणी राष्ट्रवादीनं केल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता राज्यात राजकीय घडामोडींनी वेग घेतला असून पुढे कोणता निर्णय घेतला जाणार, याविषयी चर्चा सुरु आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…