पुणे

धक्कादायक : मित्रानेच केला चाकूने वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न

पुणे : चोरलेला मोबाइल पोलिसांकडे जमा करण्यास सांगितले म्हणून रागाच्या भरात मित्राने चाकूने वार केल्याची धक्कादायक घटना बिबवेवाडी परिसरात घडली. या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून दोघांना अटक करण्यात आली आहे. सौरभ भगत (वय २१) आणि अजय प्रजापती (वय २०) अशी अटक केलेल्या दोघांची नावे आहेत.

या घटनेत सूरज कामथे (वय २९) ही व्यक्ती जखमी झाली आहे. कामथे यांनी दाखल केलेल्या तक्रारीवरून बिबवेवाडी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी व कामथे ओळखीचे आहेत. कामथे यांनी त्यांचे सिमकार्ड आरोपीला वापरण्यासाठी दिले होते. आरोपीने ते सिमकार्ड वापरून कामथे यांना परत दिले. त्यानंतर कामथे यांना राजगड पोलिसांचा फोन आला. त्यांच्या नावाचे सिमकार्ड टाकलेला मोबाइल चोरीचा असल्याचे सांगून तो पोलिस ठाण्यात आणून जमा करण्याची सूचना पोलिसांनी त्यांना केली.

मोबाइल पोलिसांत जमा करण्याचे सांगितल्याबाबत विचारणा करण्यासाठी कामथे आरोपीच्या घरी गेले होते. त्याचा राग मनात धरून आरोपीने चाकूने कामथेंना मानेजवळ, पाठीवर, छातीवर वार करून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी आसपासचे नागरिक मध्ये आले, तेव्हा त्यांच्यावरही चाकू उगारला. रस्त्यावरील गोंधळामुळे नागरिकांनी भीतीने दुकाने बंद केली. या प्रकरणी कामथे यांनी पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. या प्रकरणात सहायक निरीक्षक के. बी. पावसे अधिक तपास करत आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

उष्माघातापासून बचावासाठी नागरिकांनी सतर्क राहावे – विभागीय आयुक्त डॉ. निधी पाण्डेय

अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…

1 आठवडा ago

राज्य उत्पादन शुल्क विभागाची कारवाई; २३.५५ लाख किंमतीचा मुद्देमाल जप्त

मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…

1 आठवडा ago

मतदारांना पाय दाबून देण्यासाठी फूट मसाजर मशीनची सुविधा

सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…

1 आठवडा ago

आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करून राजकीय पक्षांनी प्रशासनाला सहकार्य करावे – निवडणूक निर्णय अधिकारी

मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…

1 आठवडा ago

निवडणूक प्रचारासाठी सर्व प्रकारच्या परवानग्या घेणेकामी एक खिडकी योजना कार्यान्वित

ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…

1 आठवडा ago

पाचव्या टप्प्यात राज्यात २६४ उमेदवार निवडणूक रिंगणात

मुंबई : लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यात राज्यातील 13 मतदारसंघात नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची प्रक्रिया…

1 आठवडा ago