Nipah Virus Found
महाबळेश्वर : महाराष्ट्राच्या चिंतेत भर टाकणारी माहिती समोर आली आहे. राज्यात वटवाघुळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळला आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीच्या शास्त्रज्ञांनी केलेल्या अभ्यासात ही माहिती समोर आली आहे. महाराष्ट्रात प्रथमच निपाह विषाणू आढळल्याची घटना घडली असून भीती व्यक्त करण्यात येत आहे.
मार्च २०२० मध्ये महाबळेश्वरमधील एका गुहेत हे वटवाघूळ सापडले होते. देशात याआधी काही राज्यात निपाह विषाणू आढळला होता पण महाराष्ट्रात याआधी वटवाघळांमध्ये निपाह विषाणू कधीही आढळला नव्हता. शास्त्रज्ञांनी वेगवेगळ्या प्रजातींच्या वटवाघुळांचे नमुने घेत संशोधन केले होते. हा विषाणू वटवाघूळांमधून मानवाच्या शरिरात संक्रमित होतो, अशी माहिती याबाबत संशोधन करणाऱ्या डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली आहे.
जागतिक आरोग्य संघटनेने निपाह व्हायरसला रोगांच्या यादीत पहिल्या १० मध्येठेवलं आहे. अद्याप निपाह व्हायसरवर कोणतंही औषध किंवा लस नसून तो खूप धोकादायक मानला जातो. याचा मृत्यूदरही अधिक आहे. निपाह व्हायरसमध्ये मृत्यूदर ६५ टक्क्यांच्या पुढे आहे. गेल्या काही वर्षांमध्ये वटवाघुळांमुळे इबोलासारखे गंभीर व्हायरस समोर आले होते. तसेच कोरोनाच्या उद्रेकामागेदेखील वटवाघूळ असल्याचाच दावा आहे.
देशात यापूर्वी २००१ मध्ये जानेवारी, फेब्रुवारी या महिन्यात पश्चिम बंगालच्या सिलिगुडीमध्ये निपाहचे ६६ रूग्ण आढळले होते. त्यापैकी ४५ रूग्णांचा मृत्यू झाला होता. २००७ मध्ये एप्रिल महिन्यात पश्चिम बंगालमधील नादिया येथे निपाहचे पाच रुग्ण आढळले होते. त्या पाचही रुग्णांचा मृत्यू झाला होता. २०१८ मध्ये केरळमध्ये निपाह व्हायरसने अक्षरशः थैमान घातलं होतं.
निपाहची लक्षणे कोणती?
प्रसार कसा होतो?
मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…
मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…
मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…
मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…
मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…
मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…