महाराष्ट्र

नरेंद्र मोदींना दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागणार, खातेवाटपावर संजय राऊतांची टीका

मुंबई : लोकसभा निवडणूक पार पडली असून निकालही हाती आले आहेत. नवं सरकार स्थापन झालं असून मंत्रिमंडळही तयार झालंय. या मंत्रिमंडळात महाराष्ट्राच्या वाट्यालासहा मंत्रिपदे आली आहेत. त्यापैकी नितीन गडकरी आणि पियुष गोयल या दोघांना त्यांना पूर्वीची केंद्रीय खाती दिली असून उर्वरित चौघांना राज्यमंत्रिपद देण्यात आलं आहे. शिंदे गटाचे प्रतापराव जाधव यांच्याकडे आरोग्य मंत्रालयाचे राज्यमंत्रिपद आणि आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र कार्यभार देण्यात आलाय. पुण्याचे भाजपा खासदार मुरलीधर मोहळ यांची पहिल्याच वेळी मंत्रिमंडळात वर्णी लागली असून त्यांच्या वाट्याला अत्यंत महत्त्वाचे नागरी विमान वाहतूक आणि सहकार राज्यमंत्रिपद देण्यात आले आहे. रक्षा खडसे यांना युवा आणि क्रीडा खात्याचे राज्यमंत्री करण्यात आले आहे. तर, रामदास आठवले यांच्याकडील सामाजिक न्याय राज्यमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असून खातेवाटपही झाले आहे. आता महाराष्ट्रात वेध लागले आहेत ते विधानसभा निवडणुकीचे. लोकसभा निवडणुकीत सपाटून मार खाललेल्या महायुतीने आता विधानसभा लक्ष्य केली आहे. तसंच, विधानसभेच्या जागावाटपासाठी वाटाघाटीही सुरू झाल्याचे समजते. यासह राज्यातील इतर महत्त्वाच्या घडामोडी पाहुयात.

संजय राऊत म्हणाले की, महाराष्ट्राच्या राजकारणात भटकती आत्म्याची गोष्ट सुरू होती. त्यावर ठाकरेंनीही उत्तर दिलं होतं. परंतु, आता केंद्रात दोन अतृप्त आत्मा आहेत. चंद्राबाबू नायडू आणि नितीश कुमार. या अतृप्त आत्म्यांचं समाधान करा. भटकती आत्मा कधी कोणाचा पाठलाग सोडत नाही, असं पवार म्हणाले आहेत. हे खरं आहे. नरेंद्र मोदींना जोपर्यंत त्यांच्या पदावरून उतरवत नाही तोवर आमची आत्मा शांत होणार आहे. नरेंद्र मोदींना दोन अतृप्त आत्म्यांची शांती करावी लागणार आहे. ज्याप्रमाणे खातेवाटप झालं आहे त्यानुसार सर्वच आत्मा अतृप्त आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

2 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

2 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

2 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

4 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

5 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago