महाराष्ट्र

जयंत पाटलांचं प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं विधान; म्हणाले, फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर…

राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) पक्षाचा २५ वा वर्धापन दिन अहमदनगरमध्ये पार पडला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. मात्र, याचवेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) प्रदेशाध्यक्ष पदाबाबत मोठं भाष्य केलं. त्यामुळे त्यांच्या विधानाचा नेमका अर्थ काय? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत.

जयंत पाटील वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात म्हणाले की, महाविकास आघाडीमध्ये शरद पवारांनी सर्वात कमी जागा घेतल्या. मात्र, सर्वात जास्त जागा निवडून आणल्या. महाविकास आघाडीत काही जागा आपण कमी घेतल्या, तीन चार जागा सोडल्या. लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रभर शरद पवारांची लाट पाहायला मिळाली. काही लोकांची भावना होती की शरद पवारांना बारामतीमध्ये अडकून ठेवायचं. मात्र, शरद पवारांनी झंझावाती दौरा केला हे महाराष्ट्रानेही पाहिलं. निवडणुकीचे बरेच डाव शरद पवारांना माहिती आहेत. अमिताभ बच्चन यांच्या एका चित्रपटातील डायलॉग तुम्हाला माहिती आहे. रिश्ते में हम तुम्हारे बाप लगते हैं, नाम है मेरा शरद पवार”…

जयंत पाटील पुढे बोलले कि, मी तुम्हाला सांगितलं होतं अ गेला तर ब आहे. ब गेला तर क आहे. क गेला तर ड आहे, कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्याकडे आहे. विद्यार्थी शाळा सोडून गेले तरी शाळा कधी बंद होत नाही. पुन्हा नवे विद्यार्थी शाळेत घडत असतात. शाळेचा हेडमास्तर हेच काम करत असतो. मी हे देखील सांगितलं आहे की, माझ्या शाळेचा हेडमास्तर खमक्या आहे आणि शरद पवारांनी खमकेपणा दाखवून दिलेला आहे. तुतारी वाजवणाऱ्या माणसाच्या चिन्हावर शरद पवारांनी एवढे खासदार निवडून आणले. मग तुम्ही कुठे आहात?”, असं म्हणत जयंत पाटील यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष टीका केली.

माझी तुम्हाला विनंती आहे. मी पक्षाचा प्रदेशाध्यक्ष आहे. माझे महिने अनेकांनी मोजून झालेले आहेत. आता माझ्या प्रदेशाध्यक्षपदाचे चार महिने मोजू नका. मी व्यवस्थित काम करतो. पण जाहीर बोलायचं बंद करा. जाहीर ट्विटरवर बोलायचं बंद करा. काय असेल तर शरद पवारांना माझी तक्रार करा. शरद पवार आमच्या दोन कानाखाली मारतील. तो त्यांचा निर्णय आहे. मी चुकीचा वागलो तर जनतेवर परिणाम होईल. फक्त चार महिने, नोव्हेंबरनंतर मीच नमस्कार करेल. पण चार महिने आपण एकदिलाने राहू आणि काम करू, पक्षात काय करायचं ते कानात येऊन सांगा. मात्र, जाहीर बोलायचं बंद करा. खासगीत बोलायचं बंद करा. टीम म्हणून काम काय असतं ते अमोल कोल्हे, निलेश लंके, बजरंग सोनवणे या सगळ्यांना माहिती आहे. हा पक्षाचा विजय आहे”, असं जयंत पाटील यांनी म्हटलं.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांका सिरोहीचे आकस्मिक निधन, चाहत्यांमध्ये शोककळा

मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…

2 दिवस ago

एसटीच्या ‘रस्ता सुरक्षा अभियाना’साठी रितेश–जेनेलिया देशमुख ब्रँड ॲम्बेसेडर

मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…

2 दिवस ago

तंत्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी जागतिक रोजगाराच्या संधी; भाषा व कौशल्य प्रशिक्षणावर विशेष भर

मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…

2 दिवस ago

राज्यात २४ एप्रिलपर्यंत वादळी वाऱ्यासह पाऊस व गारपिटीची शक्यता, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…

4 दिवस ago

राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्काराची रक्कम शिक्षणासाठी अर्पण; डॉ. गिते यांची सामाजिक बांधिलकी अधोरेखित

शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…

5 दिवस ago

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

1 महिना ago