नगर : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील एक आरोपी अजूनही फरार आहे. इतर आरोपींची चाैकशी सुरू आहे. धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर हा काही दिवस फरार होता. त्यानंतर त्याने पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयात आत्मसर्मपण केले. दरम्यान, आमदार सुरेश धस, संदीप क्षीरसागर आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांच्याकडून धनंजय मुंडे यांच्या मंत्रिपदाच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे.
धनंजय मुंडे यांच्यावर मंत्रिपदाचा राजीनामा देण्याबद्दल सतत दबाब टाकला जात आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याबद्दल बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट भूमिका मांडली आहे. धनंजय मुंडे हे काल रात्री भगवान गडाचे महंत नामदेव शास्त्री महाराज यांची भेट घेण्यासाठी गेले होते, त्यानंतर त्यांनी भगवान गडावरच मुक्काम केला. यावेळी रात्री उशीरापर्यंत नामदेव शास्त्रींसोबत त्यांची चर्चा झाली.
भगवानगड धनंजय मुंडे यांच्या पाठीशी
आता नामदेव शास्त्री यांनी धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे. नामदेव शास्त्री म्हणाले की, जाणीवपूर्वक धनंजय मुंडे यांना टार्गेट केले जात आहे. धनंजय मुंडेंची गुन्हेगारी पार्श्वभूमी नाही. मुद्दाम धनंजय मुंडेंना गुन्हेगार ठरवले जात आहे. धनंजय मुंडे यांच्या पाठिशी भगवानगड आहे. आम्ही भक्कमपणे त्यांच्या पाठीमागे असल्याचेही नामदेव शास्त्री यांनी सांगितले. नामदेव शास्त्री पुढे म्हणाले की, मुंडे खंडणी घेऊन जगणारा माणूस नाही. खंडणीवर जगणारे हे नेते नाहीत. तो त्यांच्या गावाचा मुद्दा आहे, यामुळे सामाजिक सलोखा बिघडत आहे. या प्रकरणाचा परिणाम वारकरी संप्रदायावर झाला आहे. ज्या लोकांना जातीयवाद माहिती नाही, त्यांना देखील आता कळाला. जे संत सामाजिक सलोखा निर्माण करतात, त्यांच्यामध्येही तेढ निर्माण झाल्याचे नामदेव शास्त्री यांनी म्हटले आहे. नामदेव शास्त्री यांनी या प्रकरणात धनंजय मुंडे यांची पाठराखण केली आहे.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…