मुंबई

सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा केव्हा सुरु होणार? रेल्वे प्रशासन सज्ज पण…

मुंबई : कोरोनाबाधितांच्या आकड्यात घट झाल्याने आता सर्वांसाठी लोकलप्रवास केव्हा सुरू होणार, असा प्रश्न सध्या उपस्थित केला जात आहे. रेल्वे प्रशासनाकडून भूमिका स्पष्ट करण्यात आली आहे. त्यांनी सांगितले आहे की राज्य सरकारने सूचना केल्यानंतर तातडीने सर्वसामान्यांसाठी लोकलसेवा सुरु करण्यात येईल. रेल्वे प्रशासन पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या सुरू करण्यासाठी सज्ज असून, केवळ राज्य सरकारच्या आदेशाची प्रतीक्षा आहे.

दरम्यान, विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं कि, “ट्रेन आम्ही अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरु ठेवल्या आहे आणि त्याचा परिणाम दिसत आहे. काही वेळ तरी यावर निर्बंध ठेवावे लागतील. सरसकट सूट दिली तर गर्दी होईल. त्यामुळे पुढील १५ दिवस तरी लोकल सर्व प्रवाशांसाठी खुली करता येणार नाही.

पश्चिम रेल्वेवर सध्या ९५ टक्के लोकल फेऱ्या सुरू आहेत. रेल्वे मोटारमन, गार्ड, तिकीट तपासणीस, क्लार्क अशी सर्व यंत्रणा राबतच आहे. राज्य सरकारने सर्वसामान्यांसाठी लोकल सुरू करण्याबाबत सूचना दिल्यानंतर लोकलबंदी मागे घेतली जाईल. आम्ही पूर्ण क्षमतेने लोकल फेऱ्या चालवण्यास सज्ज आहोत, असे पश्चिम रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 महिने ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 महिने ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 महिने ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 महिने ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

2 महिने ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

2 महिने ago