मुंबईत शनिवारपासून (१ ऑगस्ट) २० टक्के पाणीकपात करण्याचा निर्णय मुंबई पालिका आयुक्तांनी घेतला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या क्षेत्रांमध्ये कमी पाऊस झाल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे.
मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या तलावात आज चार लाख ९९ हजार १९९ दशलक्ष लिटर पाणी आहे. हे जलाशयांच्या पूर्ण क्षमतेच्या ३४% इतके आहे. गेल्या वर्षी याच वेळी तलावात १२ लाख ४० हजार १२२ दशलक्ष लिटर पाणी होते. ही तूट लक्षात घेऊन पालिकेनं उद्यापासून मुंबई महानगर पालिका क्षेत्रात २० टक्के पाणीकपातीचा निर्णय घेतला आहे.
गेल्या काही दिवसांआधी झालेल्या पावसामुळे काही तलावं भरण्याच्या मार्गावर आहेत. पण पावसाने पुन्हा दडी मारल्यामुळे धरणातील पाणीसाठी मर्यादित राहिला. त्यामुळे मुंबईकरांना आता पाणी प्रश्नाला तोंड द्यावं लागणार आहे.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…