The decision to start schools from 1st to 7th classes has been postponed
मुंबई : कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता मुंबईतील पहिली ते आठवीच्या शाळा बंद करण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. येत्या 31 जानेवारीपर्यंत पहिली ते आठवीच्या शाळा बंद ठेवण्यात येणार आहेत.
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णवाढ असताना मुलांना कोणताही त्रास होऊ नये, यासाठी खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीनं सांगितलं जातंय. पहिली ते आठवीच्या शाळा नुकत्याच सुरु झाल्या होत्या. मात्र पुन्हा कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका लक्षात घेता महापालिका आयुक्त इकबाल चहल यांनी शाळांबाबत अखेर निर्णय घेतला. त्यामुळे पुन्हा एकदा ऑनलाईन शाळा सुरु राहणार आहेत.
आजपासून लहान मुलांचे लसीकरण सुरु करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आजच किशोरवयीन मुलांच्या लसीकरणाचा आढावा घेतला होता. राज्यातील रुग्णांची संख्या वाढत राहिल्यास इतर जिल्ह्यांमध्ये देखील असा निर्णय घेतला जाऊ शकतो.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…