Bombay High Court
मुंबई : पतीच्या संमतीशिवाय गर्भधारणा संपुष्टात आणण्याच्या महिलेच्या निर्णयाला हिंदू विवाह कायद्यांतर्गत क्रूरता म्हणता येईल का, असा प्रश्न मुंबई उच्च न्यायालयाने नुकताच उपस्थित केला होता. न्यायमूर्ती अतुल चांदूरकर आणि उर्मिला जोशी-फाळके यांनी अधोरेखित केले की स्त्रीला “मुलाला जन्म देण्याची सक्ती केली जाऊ शकत नाही.” न्यायालयाने निरीक्षण नोंदवले कि, “अपीलकर्त्याचा/पतीचा मुद्दा जसा आहे तसा स्वीकारला गेला तरी, भारतीय राज्यघटनेच्या कलम 21 नुसार प्रजनन निवडीचा स्त्रीचा अधिकार हा तिच्या वैयक्तिक स्वातंत्र्याचा अविभाज्य भाग आहे.” लग्नानंतर कामावर जाऊ इच्छिणाऱ्या महिलेची ती क्रूरता असल्याचं म्हणता येणार नाही, असेही उच्च न्यायालयाने म्हटले आहे.
पती (47) या शिक्षकाने क्रूरता आणि त्यागाच्या कारणावरून शिक्षिका असलेल्या आपल्या पत्नीपासून घटस्फोट मागितला. त्याने आरोप केला की 2001 मध्ये त्यांच्या लग्नाच्या सुरुवातीपासूनच त्यांची पत्नी काम करण्याचा आग्रह धरत होती. पुढे त्याच्या संमतीशिवाय तिने तिची दुसरी गर्भधारणा संपुष्टात आणली आणि त्याद्वारे पतीने तिच्यावर क्रूरतेचा आरोप केला. पतीने दावा केला की त्याची पत्नी 2004 मध्ये त्याला सोडून आपल्या मुलासह घरातून निघून गेली, कधीही परत न येण्यासाठी.
उलटपक्षी, पत्नीने तिच्या वकिलामार्फत असा युक्तिवाद केला की तिने त्यांच्या पहिल्या अपत्याची प्रसूती केली आहे जे तिचा मातृत्वाचा स्वीकार दर्शवते. दुसरी गर्भधारणा तिच्या आजारपणात संपुष्टात आली, परंतु, नवऱ्याने 2004-2012 पर्यंत तिला घरात परत आणण्यासाठी किंवा त्यांच्या मुलाच्या उदरनिर्वाहासाठी कोणतेही प्रयत्न केले नाहीत. शिवाय, नवरा आणि त्याच्या बहिणी सतत तिच्या चारित्र्यावर संशय घेत असल्याने तिने घर सोडले.
खंडपीठाने असे मानले की कोणत्याही पक्षाने महिलेच्या गर्भधारणा संपुष्टात आणल्याबद्दल त्यांच्या दाव्याचे समर्थन करण्यासाठी कोणतेही पुरावे जोडलेले नाहीत. परंतु त्या महिलेने आधीच एका मुलाला जन्म दिला होता आणि तो लहान असताना काम करण्यास नकार दिला होता म्हणून पत्नी मुलाची जबाबदारी स्वीकारण्यास तयार नव्हती हे मान्य केले जाऊ शकत नाही,” असे निरीक्षण न्यायालयाने केले.
खंडपीठाने जोडले की जरी पतीचे आरोप दर्शनी मूल्यावर घेतले गेले तरी, पत्नीवर पुनरुत्पादक निवड केल्याबद्दल क्रूरतेचा आरोप केला जाऊ शकत नाही. क्रूरतेच्या आरोपांचा क्षुल्लक मुद्द्यांवर विचार केला जाऊ शकत नाही. पत्नीने घर सोडण्याच्या औचित्याबाबत कोर्टाने सांगितले की, “जेव्हा चारित्र्यावर संशय येतो तेव्हा स्त्रीला वैवाहिक घरात राहणे कठीण होते हे उघड आहे.” शेवटी, खंडपीठाने असे मानले की केवळ पत्नी विभक्त राहत असल्याने आणि त्यांच्यातील विवाह तुटल्याच्या एका पक्षकाराने केलेल्या आरोपांवरून विवाह भंग झाला हा निष्कर्ष काढता येणार नाही.
खंडपीठाने पतीने कौटुंबिक न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध दाखल केलेले अपील फेटाळून लावले, ज्यामध्ये वैवाहिक हक्क परत मिळवण्यासाठी पत्नीची याचिका मंजूर केली आणि हिंदू विवाह कायदा कलम १३(१)(आयए) आणि १३(१)(आयबी) अन्वये घटस्फोटासाठी पतीची याचिका फेटाळली.
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…