मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत कार्यालयात थेट उपलब्ध असतात. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
पूर्व उपनगरातील टागोरनगर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबद्दल जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुंबईतील रिकाम्या जमिनींविषयीचे खटले न्यायप्रलंबित आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर ही घरे बांधण्यात येतील असेही आव्हाड यांनी सांगितले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात घरे किंवा फ्लॅट्स बांधून देता येतील.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…