मुंबईसारख्या शहरात आपले घर असणे हे प्रत्येकाचे स्वप्न असते. हेच स्वप्न साकारण्यासाठी हे सरकार प्रयत्न करणार आहे, अशी माहिती गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे. म्हाडातर्फे मुंबई आणि ठाण्यात स्वस्त दरातील घरे उभारणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. यासाठी म्हाडा मुंबईतील रिकाम्या जागा खरेदी करणार असून तिथे स्वस्त दरातील घरे बांधणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
जनतेचे प्रश्न ऐकून घेण्यासाठी जितेंद्र आव्हाड दर सोमवारी दुपारी 2 ते 4 या वेळेत कार्यालयात थेट उपलब्ध असतात. यावेळी त्यांनी ही माहिती दिली.
पूर्व उपनगरातील टागोरनगर आणि कन्नमवार नगर या भागात मोठ्या वसाहती उभारण्यात येणार आहेत. याबद्दल जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. मुंबईतील रिकाम्या जमिनींविषयीचे खटले न्यायप्रलंबित आहेत. अशा जमिनी ताब्यात घेऊन त्यावर ही घरे बांधण्यात येतील असेही आव्हाड यांनी सांगितले. यामुळे सर्वसामान्य नागरिकांना स्वस्त दरात घरे किंवा फ्लॅट्स बांधून देता येतील.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…