Five days of water cut in Mumbai from tomorrow to Friday
मुंबई : मुंबईत उद्यापासून (१७ मे) शुक्रवार (२१ मे) पर्यंत सलग पाच दिवस दहा टक्के पाणीकपात केली जाणार आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांची तातडीने दुरुस्ती करायची आहे. त्यामुळे मुंबईकरांना पाणीकपातीचा त्रास सोसावा लागणार आहे.
भातसा धरणातून पिसे बंधाऱ्यात पाणी सोडले जाते. पिसे बंधाऱ्यातून पाणी शुद्धीकरण केंद्रात आणून त्याच्यावर प्रक्रिया केली जाते. हे पिण्यायोग्य केलेले पाणी मुंबईला पुरवले जाते. या प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या पिसे बंधाऱ्यातील न्यूमॅटिक झडपांच्या दुरुस्तीच्या कामाचा प्रस्ताव स्थायी समितीने मंजूर केला आहे. दुरुस्तीच्या कामाची ऑर्डर निघाली आहे.
मुंबई मनपाने नागरिकांना आवाहन केले आहे की पाण्याचा आवश्यक तेवढा साठा करावा आणि पाण्याचा जपून वापर करावा, तसेच प्रशासनास सहकार्य करावे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…