A pushback tug caught fire at Mumbai airport, fire under control now
मुंबई : मुंबई विमानतळावर सोमवारी मोठा अपघात टळला. येथे एअर इंडियाच्या विमानाच्या पुश बॅक ट्रॉलीला आग लागली होती. टोइंग वाहनाला आग लागली तेव्हा विमानात 85 लोक होते. सुदैवाने या आगीमुळे विमान आणि त्यातील प्रवाशांचे कोणतेही नुकसान झाले नाही.
आज दुपारी १ वाजेदरम्यान V26R स्टँडवर हा अपघात झाला. पुश बॅक ट्रॉलीला लागलेल्या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. आग लागल्यानंतर तात्काळ आग विझण्यात आली. 10 मिनिटांत आग आटोक्यात आणण्यात आली. त्यानंतर विमानतळावरील कामकाज सामान्यपणे सुरु आहे. एअर इंडियाची फ्लाइट (AI-647) 85 जणांना घेऊन जामनगरला रवाना होणार होती. फ्लाइट नियोजित वेळेपेक्षा 20 मिनिटे उशीरा निघाली.
पुश बॅक ट्रॉलीतून विमान टॅक्सीवेवरून धावपट्टीवर आणले जाते. त्याला जोडलेली एक रॉड विमानाच्या पुढच्या चाकाला जोडलेली असते. मग ते विमानाला धावपट्टीवर ढकलते. त्यानंतर ट्रॉली काढली जाते आणि विमान टेक ऑफसाठी धावपट्टीवर धावू लागते.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…