Maharashtra Government Is Trying To Kill Me By Speaking Sweetly Said Manoj Jarange In Aantravali Sarati
जालना : मराठा आरक्षणासाठी लढा देणारे उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २० जुलैपासून पुन्हा आमदार उपोषण सुरू केलं आहे. सगेसोयरे अध्यादेशाची अंमलबजावणी आणि मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करत त्यांनी आपलं उपोषण सुरू केलं असून आज उपोषणाचा ४ था दिवस आहे. सोमवारी जरांगे यांनी पत्रकार परिषद घेऊन राज्य सरकारवर निशाणा साधला होता. तसेच, देशाचे गृहमंत्री अमित शाह यांनी महाराष्ट्र दौरा केला, पण मराठा आरक्षणावर ते काहीही बोलले नाहीत, त्यावरुन त्यांनी शाह यांच्यावर टीका केली होती. तर, मंत्री छगन भुजबळ यांनाही इशारा देत, पुढचं उपोषण हे येवल्यात येऊन सुरू करेल, असे जरांगे यांनी म्हटले होते. आता, उपोषणाच्या चौथ्या दिवशी त्यांची तब्येत खालावली असून जालन्यातील शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय पथक त्यांच्या सेवेसाठी घटनास्थळी दाखल आहे. त्यानुसार, मनोज जरांगे यांचा बीपी व शुगर कमी झाल्याची माहिती डॉक्टरांनी दिली.
उपोषणकर्ते मनोज जरांगे यांची जालन्यातील वैद्यकीय पथकाकडून आज दुसऱ्यांदा तपासणी करण्यात आली. उपोषणाच्या चौथ्या दिवशी जरांगे यांची शुगर कमी झाली असून रक्तदाबही खालावला आहे. मनोज जरांगे यांची आरोग्य तपासणी केल्यानंतर जिल्हा शल्य चिकित्सक राजेंद्र पाटील यांनी याबाबत माहिती दिली. डॉ. राजेंद्र पाटील यांनी माध्यमांशी बोलताना म्हटले की, आम्ही मनोज जरांगे यांची तपासणी केली. सुरुवातीला त्यांचा बीपी १७०/१७४ असायचा. पण, आज त्यांचा रक्तदाब कमी झाला असून ९६/६८ एवढा बीपी आहे. त्यांची शुगरही कमी झाली आहे. डॉक्टर म्हणून त्यांच्यावर उपचार करणे माझं काम आहे, त्यांनी उपचार घ्यावे यासाठी आम्ही त्यांना विनंती करत आहोत, आमची टीम इथे त्यांच्यासाठी कार्यरत आहे, असेही डॉ. पाटील यांनी सांगितले.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…