महाराष्ट्र

मंत्रालयात बॉम्ब ठेवल्याचा फोन येताच पोलिसांची पळापळ, सुरक्षा वाढवली…

मुंबईः मंत्रालयात बॉम्ब ठेवला आहे, अशी माहिती अज्ञात व्यक्तीने फोन करुन दिली. बॉम्ब खरच ठेवण्यात आला आहे की नाही हे सांगणे कठीण आहे. पण खबरदारी म्हणून तपासणी केली जात आहे. माहिती मिळताच पोलिसांची पळापळ झाली. रविवार असल्यामुळे मंत्रालयाच्या इमारतीत माणसांची उपस्थिती कमी होती. पण जेवढे नागरिक आतमध्ये होते त्यांना बाहेर काढून तातडीने मंत्रालयाची इमारत रिकामी करण्यात आली.

बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड यांच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू झाला. एक टीम विधीमंडळाच्या सचिवालयातही तपास करत आहे. याआधी काही महिन्यांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच राज्यातील काही नेते मंडळींना धमक्यांचे फोन आले होते. याप्रकरणी एका व्यक्तीला अटक झाली होती.

पोलिसांनी सांगितले कि, फोन येताच पोलिसांनी मंत्रालय आणि विधीमंडळाच्या सचिवालयाला घेराव घातला असून दोन्ही इमारती रिकाम्या करण्यात आल्या आहेत. बॉम्ब स्क्वाड आणि डॉग स्क्वाड यांच्या मदतीने बॉम्बचा शोध सुरू आहे. फोन कुठून आला आणि कोणी केला याचा शोध घेण्याचे काम पोलिसांचे स्वतंत्र पथक करत आहे. बॉम्ब संदर्भातली माहिती ही बनावट असल्यास कायदयानुसार फोन करणाऱ्या व्यक्तीला अटक करुन कारवाई केली जाईल. माहिती खरी असल्याचे आढळले तर त्या व्यक्तीला माहिती कशी मिळाली याची चौकशी केली जाईल. तसेच माहिती देऊन मोठे संकट टाळल्याप्रकरणी संबंधित व्यक्तीचा उचित सन्मान केला जाईल, असे पोलिसांनी सांगितले.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

हिंगोलीत धक्कादायक प्रकार! डिझेलअभावी रुग्णवाहिका न मिळाल्याने गर्भातील बाळाचा दुर्दैवी मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…

2 आठवडे ago

भाविकांसाठी आनंदाची बातमी; धार्मिक स्थळांवर मिळणार दर्जेदार आणि पौष्टिक अन्न सेवा सुविधा

बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…

2 आठवडे ago

पुण्यात विषारी दारू प्यायल्याने १२ जणांचा मृत्यू, दोषींवर कठोर कारवाईचे आदेश

मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…

2 आठवडे ago

व्यसनमुक्ती क्षेत्रातील अविरत समाजकार्याची दखल; डॉ. सोमनाथ गिते यांचा मा. माधुरीताई मिसाळ यांच्या हस्ते सत्कार

पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…

2 आठवडे ago

भरतीच्या बोगस जाहिरातींपासून सावध राहण्याचे आवाहन

मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…

3 आठवडे ago

पुण्यात उष्णतेचा कहर! IMD चा यलो अलर्ट जारी; नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन

पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…

4 आठवडे ago