Flood Alert In Kolhapur As Emergency Gate Of Radhanagari Dam Opened Due To Technical Fault
कोल्हापूर : राधानगरी धरणाचा दरवाजा अडकल्याने बंद होत नसल्यामुळे कोल्हापुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. तांत्रिक कामासाठी उघडण्यात आलेला हा दरवाजा जवळपास १८ फुटाने उघडला गेला आहे. त्यामुळं पंचगंगा, भोगावती नदीपात्रात पाण्याचा मोठा विसर्ग सुरू झाला असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
जलसंपदा विभागातील तांत्रिक विभागातील अभियंते आणि कर्मचाऱ्यांचे पथक तातडीने राधानगरी धरणाकडे रवाना झाले आहे. नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढला असून पंचगंगेसह अनेक नद्यांच्या पाणी पातळीत दिवसभरात मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे अडकलेला धरणाचा दरवाजा बंद करण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढल्याने कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी प्रशासनाकडून काळजी घेतली जात आहे.
सध्या कोल्हापुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली असून हा तांत्रिक बिघाड लवकर दुरुस्त न झाल्यास महापूराची भीती निर्माण झाली आहे. तसेच धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात होत असल्याने नंतर शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होऊ शकतो.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…