महाराष्ट्र

‘आम्ही मंत्री आहोत, आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार’, नितीन गडकरी असं का म्हणाले? जाणून घ्या…

नागपूर : गरिबांच्या हितासाठी कोणताही कायदा आडकाठी आणू शकत नाही. गरीबांच्या कल्याणासाठी कायदा १० वेळा मोडावा लागला तरी तो मोडला पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणूनच जनतेच्या हितासाठी कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूर शाखेच्या बहुविद्याशाखीय मल्टी-मॉडल निकालांतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ‘येस सर’ म्हणत आम्ही जे सांगतो त्याचे पालन करावे. सरकार अधिकाऱ्यांच्या मताने चालत नाही तर जनतेच्या मताने चालते.

गडकरी पुढे म्हणाले कि, 1995 मध्ये मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना गडचिरोली आणि मेळघाटात कुपोषणामुळे दोन हजार आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यावेळी त्या भागातील 450 गावांना रस्ते नव्हते आणि वनविभागाचे कायदे रस्ते बांधण्यापासून रोखत होते. रस्त्यांअभावी विकास होत नव्हता.त्यावेळी मी माझ्या पद्धतीने तो प्रश्न सोडवला होता. तुम्ही म्हणता तसे सरकार चालणार नाही, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, असे नितीन गडकरी म्हणाले. त्यामुळे आम्ही सांगू त्यानुसार सरकार काम करेल. नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही फक्त ‘हो सर’ म्हणा आणि आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करा.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago