Union Minister Nitin Gadkari
नागपूर : गरिबांच्या हितासाठी कोणताही कायदा आडकाठी आणू शकत नाही. गरीबांच्या कल्याणासाठी कायदा १० वेळा मोडावा लागला तरी तो मोडला पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणूनच जनतेच्या हितासाठी कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूर शाखेच्या बहुविद्याशाखीय मल्टी-मॉडल निकालांतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ‘येस सर’ म्हणत आम्ही जे सांगतो त्याचे पालन करावे. सरकार अधिकाऱ्यांच्या मताने चालत नाही तर जनतेच्या मताने चालते.
गडकरी पुढे म्हणाले कि, 1995 मध्ये मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना गडचिरोली आणि मेळघाटात कुपोषणामुळे दोन हजार आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यावेळी त्या भागातील 450 गावांना रस्ते नव्हते आणि वनविभागाचे कायदे रस्ते बांधण्यापासून रोखत होते. रस्त्यांअभावी विकास होत नव्हता.त्यावेळी मी माझ्या पद्धतीने तो प्रश्न सोडवला होता. तुम्ही म्हणता तसे सरकार चालणार नाही, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, असे नितीन गडकरी म्हणाले. त्यामुळे आम्ही सांगू त्यानुसार सरकार काम करेल. नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही फक्त ‘हो सर’ म्हणा आणि आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करा.
पुणे : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे महानगरपालिकेच्या वतीने आयोजित विशेष सत्कार समारंभात व्यसनमुक्ती अभ्यासक व सामाजिक…
बारामती : पुणे जिल्ह्यातील बारामती शहरात तरुणीचा अकस्मात आणि संशयास्पद मृत्यू झाल्याप्रकरणी तिच्या आईने दिलेल्या…
नाशिक : शनिवारी (दि. ८) झालेल्या महासभेत स्मार्टसिटी कंपनी आणि ‘एमएनजीएल’मुळे शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था…
पुणे : पारी टॉवर्स सहकारी गृहरचना संस्था मर्यादित, नऱ्हेच्या संचालक मंडळाच्या पंचवार्षिक निवडणुकीत ‘उघडलेले पुस्तक’…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…