Union Minister Nitin Gadkari
नागपूर : गरिबांच्या हितासाठी कोणताही कायदा आडकाठी आणू शकत नाही. गरीबांच्या कल्याणासाठी कायदा १० वेळा मोडावा लागला तरी तो मोडला पाहिजे, असे महात्मा गांधी म्हणाले होते. म्हणूनच जनतेच्या हितासाठी कायदा मोडण्याचा अधिकार आम्हाला आहे. आम्ही मंत्री आहोत, त्यामुळे आम्हाला कायदा मोडण्याचा अधिकार आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या नागपूर शाखेच्या बहुविद्याशाखीय मल्टी-मॉडल निकालांतर्गत आदिवासींच्या आरोग्यासाठी ब्लॉसम नावाच्या प्रकल्पाचे उद्घाटन केले. यावेळी नितीन गडकरी म्हणाले की, अधिकाऱ्यांनी ‘येस सर’ म्हणत आम्ही जे सांगतो त्याचे पालन करावे. सरकार अधिकाऱ्यांच्या मताने चालत नाही तर जनतेच्या मताने चालते.
गडकरी पुढे म्हणाले कि, 1995 मध्ये मनोहर जोशी राज्याचे मुख्यमंत्री असताना गडचिरोली आणि मेळघाटात कुपोषणामुळे दोन हजार आदिवासी बालकांचा मृत्यू झाल्याची बातमी आली होती. त्यावेळी त्या भागातील 450 गावांना रस्ते नव्हते आणि वनविभागाचे कायदे रस्ते बांधण्यापासून रोखत होते. रस्त्यांअभावी विकास होत नव्हता.त्यावेळी मी माझ्या पद्धतीने तो प्रश्न सोडवला होता. तुम्ही म्हणता तसे सरकार चालणार नाही, हे प्रशासकीय अधिकाऱ्यांनी लक्षात ठेवा, असे नितीन गडकरी म्हणाले. त्यामुळे आम्ही सांगू त्यानुसार सरकार काम करेल. नितीन गडकरींनी अधिकाऱ्यांना सांगितले की, तुम्ही फक्त ‘हो सर’ म्हणा आणि आम्ही दिलेल्या आदेशाचे पालन करा.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…