मुंबई : एकनाथ शिंदे हे आज आझाद मैदानावरील महायुतीच्या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्री म्हणून शपथ ग्रहण करतील, अशी माहिती आहे. बुधवारी देवेंद्र फडणवीस यांनी दोनवेळा वर्षा बंगल्यावर शिंदेंची भेट घेत त्यांच्यासोबत चर्चा केली. मात्र, ते गृहमंत्रिपदासाठी आग्रही होते. वारंवार महायुतीच्या नेत्यांच्या बैठका होत होत्या. मात्र, शपथविधीच्या आदल्या दिवशीपर्यंत कोणताच तोडगा निघत नव्हता. याबाबत अजूनही अनेक तर्क-वितर्क लावले जात होते.
शिंदे गृहमंत्रिपदासाठी ठाम होते. फडणवीसांना कुठलाही तोडगा निघताना दिसत नव्हता, तेव्हा तुमच्या मागण्यांबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलून तुम्हाला कळवण्यात येईल, असं फडणवीस म्हणाले. अखेर, शपथविधी काही तासांवर येऊन ठेपल्यानंतर आता एकनाथ शिंदे शपथ ग्रहण करण्यासाठी तयार झाले आहेत. भाजपने शिंदेंना गृहखात्याऐवजी नवी ऑफर देत महसूल खातं शिवसेनेसाठी सोडण्याची तयारी दर्शवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. यावर एकनाथ शिंदेंनीही तयारी दर्शवल्याची माहिती आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेत सकारात्मक चर्चा सुरु असल्याचं दिसत आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला गृहखात्याऐवजी इतर काही महत्त्वाची खाती देखील मिळण्याची शक्यता आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, देवेंद्र फडणवीस यांनी शिंदेंना विनंती केली की, तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्री झालो. आपण एकत्र निवडणुकीला सामोरे गेलो. अडीच वर्ष एकत्र काम केलं. तुमच्या मागण्यांची दखल घेतली असून त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोडगा काढण्यात येईल. तुमच्या मागण्यांवर चर्चा केली जात आहे. तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली. त्यामुळे तुम्हीही सरकारमध्ये सामील व्हावं, अशी इच्छा आहे. जर, फक्त मी आणि अजित पवारांनी शपथ घेतली, तर ते योग्य दिसणार नाही. त्यामुळे तुम्हीही शपथ ग्रहण करावी. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेण्याची तयारी दाखवली.
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…