महाराष्ट्र

पत्नीबरोबर दोन मुलांची हत्या करून डॉक्टरची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये सांगितलं कारण…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील राशीन गावात डॉक्टर महेंद्र थोरात यांनी पत्नी आणि दोन मुलांसह आत्महत्या केली. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. डॉक्टर थोरात यांनी आपली पत्नी वर्षाराणी, मुलगा कृष्णा आणि कैवल्य यांना सलाईनद्वारे विषारी इंजेक्शन दिले, त्यानंतर त्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली, अशी माहिती मिळत आहे. शनिवारी पहाटेच्या सुमारास ही धक्कादायक घटना घडली.

खोलीच्या दरवाजाला डायरीच्या 22 नोव्हेंबर 2021 या पानावर त्यांनी सुसाईड नोट लिहून ठेवली होती. त्यात त्यांनी लिहिले होते कि, “आम्ही आज आपल्यापासून कायमचा निरोप घेत आहोत. मुलगा कृष्णाला कानाने ऐकायला येत नाही त्याला समाजात अपमानास्पद वागणूक मिळत आहे. आम्हाला समाजात अपराध्यासासारखे वाटत आहे. अनेक दिवसांपासून आम्ही व्यथित झालेलो आहोत. कृष्णाचे पण कशात मन लागत नाही, सतत त्यालाही वाईट वाटते. परंतु तो कधी म्हणून दाखवत नाही. एक आई-वडील म्हणून त्याला असणारे आणि होणारे दुःख आम्ही सहन करु शकत नाही. मी आणि माझी मिसेस सौ वर्षा आम्ही दोघांनी मिळून, चर्चा करुन, विचाराने निर्णय घेत आहोत. असे कृत्य करणे आम्हालापण योग्य वाटत नाही. यासाठी कोणालाही प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे दोषी समजू नये.”

महेंद्र थोरात यांनी आपल्या राहत्या घरीच आत्महत्या केली. या घटनेनंतर कर्जत पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी चौघांचेही मृतदेह ताब्यात घेतले. महेंद्र थोरात यांनी गरिबांचे डॉक्टर अशी ओळख मिळवली होती. या घटनेमुळे राशीन गावात बंद पुकारण्यात आला आहे.

थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 आठवडा ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 आठवडा ago

जाहिरातीतून एसटी कमविणार २५० कोटी रुपये – परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई : महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात धावणारी ‘लालपरी’ आता केवळ प्रवाशांची नव्हे, तर महसूलवाढीलाही वेग देणार आहे.…

1 आठवडा ago

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीत अडकलेल्या नागरिकांच्या मदतीसाठी केंद्र सरकारसोबत समन्वय

मुंबई : आखाती देशांमध्ये निर्माण झालेल्या युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर तेथे अडकलेल्या महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राज्य…

1 आठवडा ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राच्या विकासासाठी विविध सामंजस्य करार

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील भारत मंडपम् येथे आयोजित ‘इंडिया एआय इम्पॅक्ट समिट 2026’ मध्ये…

3 आठवडे ago

महिलांच्या सुरक्षिततेसाठी कायदे अधिक कडक व प्रभावी करावेत – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई : महिलांवरील अत्याचार, छळ आणि कौटुंबिक हिंसाचाराच्या घटनांना आळा घालण्यासाठी अस्तित्वात असलेले कायदे अधिक…

1 महिना ago