धुळे : धुळे शहरालगत असणाऱ्या अवधान गावात एकाच कुटुंबातील पाच जणांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. अल्पवयीन मुलांसह आई-वडिलांनी विष पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. या घटनेतून सर्व जण बचावले असून डायमंड वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, धुळे शहरातील अवधान परिसरात सोमवारी रात्री १० च्या सुमारास कौटुंबिक कलहांना कंटाळून ही घटना घडली आहे. गणेश गोपाळ हे आपली पत्नी आणि मुले आणि अन्य एका तरुणासह या परिसरात राहत होते. त्यांनी येथे भाडेतत्वावर घर घेतलेले होते. गणेश आणि सविता यांचे प्रेमसंबंध होते. प्रेमसंबंधातून दोघांनी लग्न केले होते. पण त्यांच्या या प्रेम संबंधांना कुटुंबीयांचा विरोध होता. त्यातून होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केलं. गणेश गोपाळ (42), त्यांची पत्नी सविता (35), मुलगी जयश्री(14), मुलगा गोविंदा गणेश गोपाळ आणि भरत पारधी अशी आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कुटुंबीयांची नावं आहेत.
दरम्यान, गोपाळ यांनी घडलेला प्रकार घरमालकांना सांगितलं आणि सर्वांनी विष प्राशन केल्याची माहिती दिली. त्यानंतर शेजाऱ्यांनी सर्वांना तातडीने रुग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे पाचही जणांचे प्राण वाचले आहे. त्यांच्यावर डायमंड वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. मात्र, भरत पारधी यांची प्रकृती गंभीर आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…