विकास निधीचे समान वितरण होत नसून विकास निधीवर राष्ट्रवादीने डल्ला मारला, असं काँग्रेस आमदारांचं म्हणणं आहे. त्याविरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा काँग्रेसच्या ११ आमदारांनी दिला आहे. ‘सामना’च्या अग्रलेखातून काँग्रेस आमदारांच्या या भूमिकेचा समाचार घेण्यात आला आहे. ‘काँग्रेसचे आमदार उपोषणाला बसणार असतील तर तो काँग्रेसचा प्रश्न आहे. त्यांच्या या भूमिकेमुळं विरोधकांच्या हाती आयते कोलीत मिळणार आहे. शिवाय, काँगेस नेतृत्वासमोरील अडचण वाढणार आहे, ही जाणीव शिवसेनेनं काँग्रेसच्या आमदारांना करून दिली आहे.
विकास निधी वाटपाच्या असमतोलाच्या विरोधात उपोषणाला बसण्याचा इशारा देणाऱ्या काँग्रेस आमदारांना शिवसेनेनं स्पष्ट शब्दांत सुनावलं आहे. काँग्रेसचे आमदार आपल्याच सरकारविरोधात उपोषणाला बसणार असतील तर ज्यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्यास परवानगी दिली त्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यावरच अविश्वास व्यक्त केल्यासारखे होईल,’ असं शिवसेनेनं म्हटलं आहे. तसंच, काँग्रेस जर राष्ट्रवादीवर पक्षपाताचा आरोप करत असेल तर अर्थमंत्री अजित पवार त्यावर उत्तर देतील, असं म्हणत शिवसेनेनं या वादापासून हात झटकले आहेत.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…