सांगली : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी सकाळी चंद्रकांत पाटील यांच्यावर टीका केली होती. त्यावर आता चंद्रकांत पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असा टोला चंद्रकांत पाटील यांनी शरद पवार यांना लगावला. ते सांगली येथे बोलत होते.
“मला गाव सोडून जावं लागतं असं शरद पवार बोलले. पवारांना माढा मधून लढावं लागलं. मात्र पराभूत होतील म्हणून त्यांना माढा सोडावं लागलं. पक्षापेक्षा त्यांनी स्वत:चा विचार केला. माढ्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्याचे जाहीर करुन नंतर तो निर्णय मागे घेणाऱ्या शरद पवारांनी मला शिकवू नये,” असे चंद्रकांत पाटील म्हणाले.
शरद पवार आज मुंबईत असताना त्यांना चंद्रकांत पाटील यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला. पत्रकारांच्या या प्रश्नाचे उत्तर देताना त्यांनी “महत्त्वाच्या लोकांबद्दल मी काय बोलावं? ज्यांना आपलं गाव सोडून दुसरीकडे राहायला जावं लागतं, त्यांच्याबद्दल मी कशाला बोलू?”, अशी टिपण्णीही त्यांनी केली होती. त्यांच्या या वक्तव्याचे प्रत्युत्तर देताना चंद्रकांत पाटील यांनी शरद पवारांवर पलटवार केला आहे.
अमरावती, दि. 18 (जिमाका) : पावसाळ्यात पुरामुळे बाधित होणाऱ्या ठिकाणी तसेच दुर्गम गावांत जलदरित्या मदत…
अमरावती, दि. 8 : जिल्ह्याचे तापमान 40 अंशाच्या वर असून तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता…
मुंबई, दि. 8 : उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने ठाणे जिल्ह्यातील विविध ठिकाणी 7 मे…
सोलापूर : जिल्ह्यातील सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघासाठी 7 मे 2024 रोजी सकाळी सात ते…
मुंबई : लोकसभा निवडणुकीसाठी आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी सुरू झाली आहे. राजकीय पक्षांनीही आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे…
ठाणे : भिवंडी लोकसभा मतदार संघांतर्गत निवडणुकी करता उभे राहिलेले सर्व उमेदवार अंतिम झाल्यावर सर्व…