Maharashtra Weather Updates rain forecast
मुंबई : अरबी समुद्रात पुन्हा एकदा हवेच्या कमी दाबाचं क्षेत्र निर्माण झालं आहे. पुढील एक-दोन दिवसांत याची तीव्रता आणखी वाढण्याची शक्यता असून पुढील काही दिवस कोकणासह मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. किनारपट्टी व आतल्या भागात ढगाळ वातावरण निर्माण झाले आहे. पुढील पाच दिवस हवामान खात्याने अनेक जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या हवेच्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता वाढत असून किनारपट्टीवर वादळी वारे वाहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 19 नोव्हेंबरनंतर याची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता असून किनारपट्टी भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तासांत वाऱ्याची गती वाढण्याची शक्यता आहे.
मध्य पूर्व अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून रायगड आणि रत्नागिरी येथे गडगडाटी ढग दिसत असून आतल्या भागातही ढगांची दाटी दिसत आहे. हवामान खात्याने आज मुंबई, ठाणे, नाशिक, पालघर, पुणे, अहमदनगर, सोलापूर, सांगली, सातारा, कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी केला आहे. या जिल्ह्यांमध्ये ढगांच्या गडगडाटासह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. राज्यात आजपासून पाच दिवस मेघगर्जनेसह जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे.
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…