महाराष्ट्र

राज्यात किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू, सहा वर्षांतील सर्वाधिक आकडेवारी

मुंबई : महाराष्ट्रात 2022 मध्ये आतापर्यंत किमान 25 जणांचा उष्माघातामुळे मृत्यू झाला आहे, जो सहा वर्षांतील सर्वाधिक असल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून समोर आले आहे. याआधी 2016 मध्ये उष्माघाताने 19 जणांचा मृत्यू झाला होता.

1 मे 2022 पर्यंत उष्माघाताची एकूण 381 प्रकरणे आरोग्य विभागाकडे नोंदवण्यात आली आहेत. उष्माघातामुळे सर्वाधिक 11 मृत्यू नागपुरात, त्याखालोखाल औरंगाबादमध्ये 5 आणि नाशिकमध्ये 4 मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. नागपूर विभागात राज्यातील सर्वाधिक ३०० प्रकरणे आहेत.

दरम्यान, राज्याच्या काही भागात पुढील काही दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या म्हणण्यानुसार, धुळे, नंदुरबार, जळगाव आणि अहमदनगर जिल्ह्यांचा समावेश असलेल्या उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागात ४ मे ते ६ मे दरम्यान उष्णतेची लाट जाणवेल. तर कोकण आणि गोवा परिसर, मराठवाडा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात उष्णतेच्या लाटेसारखी परिस्थिती दिसणार नाही. तथापि, मराठवाड्यात उष्णतेची लाट येणार नसली तरी या प्रदेशातील कमाल तापमान जास्त म्हणजेच ४० अंश सेल्सिअस किंवा त्याहून अधिक राहील. उत्तर मध्य महाराष्ट्रात उष्णतेची लाट येण्याचे कारण म्हणजे वायव्य भारतातून येणाऱ्या उष्ण आणि कोरड्या लाटा आहेत.

वायव्य आणि मध्य भारतात पारा उच्च आणि सरासरी कमाल तापमान अनुक्रमे 35.9 आणि 37.78 अंश सेल्सिअसवर पोहोचल्याने काही आठवड्यांपासून देशातील अनेक भाग तीव्र उष्णतेच्या लाटेत त्रस्त आहेत.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

‘बार्टी’ कडून यूपीएससी-सीएपीएफ मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांना २५ हजारांचे आर्थिक साहाय्य

मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या माध्यमातून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या…

3 दिवस ago

महाराष्ट्रात आधुनिक विषाणू निदान प्रयोगशाळांचे जाळे उभारण्याचा महत्वपूर्ण निर्णय – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई : राज्यात आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या…

3 दिवस ago

भटक्या प्राण्यांकरिता निवारा उभारणीसाठी जागा शोधण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई उपनगर जिल्हा प्राणी क्लेश प्रतिबंधक समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी (सामान्य प्रशासन)…

3 दिवस ago

मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग ‘मिसिंग लिंक’ : वेग, सुरक्षितता आणि आधुनिक अभियांत्रिकीचा संगम

मुंबई : मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग हा महाराष्ट्राच्या प्रगतीचा कणा मानला जातो. राज्यातील औद्योगिक, आर्थिक आणि…

3 दिवस ago

राज्यात सात जिल्ह्यांत एमआरआय सेवेचे लोकार्पण ; ११ जिल्ह्यांत मोफत डायलिसीस सेवेचा विस्तार

मुंबई : महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून राज्यातील आरोग्य सेवेला बळकटी देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेत, सात…

3 दिवस ago

फार्मर आयडी :२० मेपूर्वी नोंदणी करण्याचे आवाहन, अन्यथा योजनांचा लाभ बंद

मुंबई : ज्या शेतकरी बांधव-भगिनींनी अद्याप आपला फार्मर आयडी काढलेला नाही, त्यांनी तत्काळ नोंदणी करून…

3 दिवस ago