Ajit Pawar
मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. त्यांनी पंतप्रधानांचे वर्णन करिष्माई नेते असे केले आहे. अजित पवार शुक्रवारी जळगावात राज्यस्तरीय कार्यकर्ता शिबिरात बोलत होते. यावेळी ते म्हणाले- नरेंद्र मोदी हे देशाचे माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यासारखे करिष्माई नेते आहेत. त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांचेही कौतुक केले. पवार म्हणाले की, या दोन नेत्यांमुळेच आज देशातील बहुतांश राज्यात भाजपचे सरकार आहे.
वाजपेयींच्या काळातील भाजपची तुलना
नरेंद्र मोदी आणि अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातील भाजपची तुलनाही पवारांनी केली. ते म्हणाले की, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काळातही भाजपला पूर्ण बहुमत मिळाले नव्हते, मात्र मोदींच्या कार्यामुळे आणि करिष्म्यामुळे भाजपने केंद्रात दोनदा स्वबळावर सरकार स्थापन केले आहे. बहुतेक राज्यांमध्ये त्यांचे सरकार आहे. एप्रिलमध्येही पंतप्रधानांचे कौतुक करताना पवार म्हणाले होते, 2 खासदार असलेल्या भाजपला 2014 आणि 2019 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन करता आले ते केवळ मोदींमुळे.
महाराष्ट्र सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप
अजित पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले पण महाराष्ट्रातील शिवसेना-भाजप युती सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप केला. ते म्हणाले कि, एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये भ्रष्टाचार शिगेला पोहोचला आहे. येथे अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे दर ठरलेले आहेत. राज्यातील असे अनेक मंत्री आहेत ज्यांच्या स्वीय सहाय्यकांच्या घरावर भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली छापे टाकण्यात आले आहेत.
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…