know signs prevention and treatment of norovirus
Norovirus : देशात कोरोना विषाणूची लस वेगाने दिली जात असली तरी लोक अजूनही कोविड-19 सारख्या जीवघेण्या संसर्गाशी झुंज देत आहेत. विशेषत: केरळमध्ये कोरोनाचे प्रमाण खूप जास्त आहे, त्यातच आता तेथील लोकांना एका नवीन विषाणूचा सामना करावा लागत आहे. केरळच्या वायनाड जिल्ह्यात आतापर्यंत 13 नोरोव्हायरसची प्रकरणे नोंदवली गेली आहेत, तर 15 हून अधिक लोकांमध्ये त्याची लक्षणे दिसत आहेत.
केरळच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी सांगितले की, वायनाड कॉलेज ऑफ व्हेटरनरी अँड अॅनिमल सायन्सेसच्या 13 विद्यार्थ्यांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे आणि त्यांच्यामध्ये जास्त लक्षणे दिसत आहेत. सर्व रुग्ण महिला वसतिगृहात राहतात. त्यांच्यामध्ये जुलाब, उलट्या यांसारखी लक्षणे दिसून येत आहेत. या घटनेच्या पार्श्वभूमीवर सरकारी अधिकाऱ्यांनी लोकांना त्यांच्या सभोवताली स्वच्छता राखण्यास सांगितले आहे. चला तर जाणून घेऊया या नवीन विषाणूबद्दल…
नोरोव्हायरस म्हणजे काय?
नोरोव्हायरस हा विषाणूंचा समूह आहे ज्यामुळे गॅस्ट्रोइंटेस्टाइनल रोग होतो. दूषित पृष्ठभाग किंवा अन्नाच्या संपर्कातून एका संक्रमित व्यक्तीपासून दुसर्या व्यक्तीमध्ये तो पसरू शकतो. या विषाणूचा प्रसार होण्याचा सर्वात सामान्य मार्ग म्हणजे अन्न किंवा पाणी आहे. हा विषाणू अत्यंत सांसर्गिक आहे आणि एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये सहज पसरू शकतो. याचे कारण म्हणजे नोरोव्हायरसची लागण झालेली व्यक्ती अब्जावधी नोरोव्हायरस कणांना पसरवू शकते.
एखाद्या व्यक्तीला अनेक वेळा नोरोव्हायरसची लागण होऊ शकते, कारण नोरोव्हायरसचे अनेक प्रकार आहेत. एका प्रकारच्या नोरोव्हायरसचा संसर्ग झाल्यामुळे इतर प्रकारच्या नोरोव्हायरसपासून संरक्षण मिळत नाही. एखाद्या व्यक्तीमध्ये एका प्रकारच्या विषाणूविरूद्ध प्रतिकारशक्ती विकसित होते, परंतु रोग प्रतिकारशक्ती किती काळ टिकते हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. नोरोव्हायरसचा उद्रेक कधीही होऊ शकतो, परंतु ते जास्त करून नोव्हेंबर ते एप्रिल दरम्यान होतात.
नोरोव्हायरसची लक्षणे काय आहेत?
उपचार
हा विषाणू अद्याप प्राणघातक मानला गेला नाही, परंतु त्यावर उपचार करण्यासाठी कोणतेही औषध उपलब्ध नाही. अतिसार आणि उलट्यांसाठी सामान्य औषधांच्या मदतीने उपचार केले जातात. नोरोव्हायरस असलेल्या रुग्णांना भरपूर पाणी आणि द्रव पिण्याचा सल्ला दिला जातो, कारण उलट्या आणि अतिसारामुळे शरीरात पाण्याची कमतरता (गंभीर निर्जलीकरण) होऊ शकते.
नोरोव्हायरसपासून बचाव कसा करायचा?
या विषाणूपासून बचाव करण्यासाठी आपण प्रतिबंधात्मक उपाय करू शकतो. विशेषत: जे लोक दररोज प्राण्यांच्या संपर्कात येतात, त्यांनी काळजी घ्यायला हवी.
अंडी ताजी आहेत की खराब कसे ओळखाल? अंडी किती दिवस टिकतात? जाणून घ्या…
हिवाळ्यात वाढते सांधे आणि हाडांचे दुखणे, ‘या’ उपायांनी मिळेल आराम
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…
मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…
नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…
पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…
मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…