Recruitment
IT Companies : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने खासगी क्षेत्रात पुन्हा नोकरीच्या संधी येऊ लागल्या आहेत. डिजिटल क्षेत्रातील आयटी कंपन्या या वर्षीही मोठी भरती करत आहेत. टाटा समूहाची TCS, Infosys, Wipro, HCL, Cognizant आणि Capgemini सारख्या IT कंपन्या मोठ्या प्रमाणात भरती करत आहेत. या IT कंपन्यांनी जास्तीत – जास्त फ्रेशर्ससाठी नवीन भरतीची घोषणा केली आहे. यासोबतच या कंपन्यांनी आर्थिक वर्षात तीन लाखांहून अधिक नवीन नियुक्त्या करण्याची घोषणा केली आहे.
विप्रो-एचसीएल, TCS मध्ये भरती
विप्रोने चालू आर्थिक वर्षात 30,000 भरतीचे लक्ष्य ठेवले आहे, जे मागील वर्षाच्या म्हणजे 2021 च्या जवळपास दुप्पट आहे. गेल्या आर्थिक वर्षात विप्रोने 17,500 नियुक्त्या केल्या होत्या. HCL ने यावर्षी भरतीचे लक्ष्य 45 हजार केले आहे. टाटा समूहाच्या टीसीएसने लक्ष्यापेक्षा अधिक भरती केली. देशातील सर्वात मोठी IT कंपनी TCS ने चालू आर्थिक वर्षात 40 हजार पदवीधर म्हणजेच फ्रेशर्सची भरती करण्याचे लक्ष्य ठेवले आहे. गेल्या वर्षीही टीसीएसने सुमारे एवढ्या भरतीचे उद्दिष्ट ठेवले होते, परंतु कंपनीने त्याच्या तुलनेत एक लाख नवीन नियुक्त्या केल्या.
इन्फोसिसमध्ये 50 हजारांची भरती
देशातील सर्वात मोठ्या IT कंपन्यांपैकी एक असलेली Infosys यावर्षी 50,000 फ्रेशर्सची भरती करणार आहे. 2021 मध्ये, कंपनीने 85,000 नवीन नियुक्त्या केल्या, जे लक्ष्यापेक्षा जवळपास दुप्पट आहे. यंदाही ५० हजारांहून अधिक अपॉइंटमेंट्स होऊ शकतात.
मुंबई : हरियाणवी मनोरंजन क्षेत्रातील उदयोन्मुख अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांमध्ये शोककळा पसरली…
मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या ‘रस्ता सुरक्षा…
मुंबई : विद्यार्थ्यांना परदेशात रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्यासाठी संबंधित देशांची भाषा व संस्कृतीचे ज्ञान अत्यावश्यक…
मुंबई : भारतीय हवामान खात्याच्या (आयएमडी) दिनांक २० एप्रिल २०२६ रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय…
शिबलापूर : समाजहिताची जाणीव जपत आणि शिक्षणाला हातभार लावण्याच्या उद्देशाने, महाराष्ट्र शासनाकडून प्रदान करण्यात आलेल्या…
बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…