Abortion pill: method of use, advantages and disadvantages
अनियोजित गर्भधारणा झाल्यास प्रत्येक स्त्रीच्या मनात अनेक प्रश्न उद्भवतात. जसे की यावेळी गर्भपाताची गोळी घेणे सुरक्षित आहे का? किंवा त्यांना मेडिकल टर्मिनेशन ऑफ प्रेग्नन्सी (MTP) करण्याची आवश्यकता आहे? गर्भपाताच्या गोळीचे साइड इफेक्ट्स काय आहेत? खरं तर, गर्भपात करण्याच्या सर्व पर्यायांबद्दल आणि त्याबद्दलच्या कायद्याबद्दल आपल्या देशातील महिलांमध्ये फारच कमी जागरूकता आहे. आपण जर अनियोजित गर्भधारणेबद्दल विचार करून त्रस्त असाल, तर या लेखात आपल्याला गर्भपाताशी संबंधित सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील.
एमटीपी (MTP) म्हणजे काय?
एमटीपी हे एक औषध आहे, जे गर्भपात करण्यासाठी वापरले जाते. ते आपण डॉक्टरांच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय थेट मेडिकल स्टोअरमधून खरेदी करू शकत नाही. त्याच्या वापरासंदर्भात सरकारने कायदा बनविला आहे, ज्याला वैद्यकीय गर्भधारणा समाप्ती कायदा (Medical Termination of Pregnancy Act) नावाने ओळखले जाते. या कायद्यानुसार कोणत्याही भारतीय महिलेला कोणत्या परिस्थितीत गर्भपात करता येऊ शकतो, हे स्पष्ट करण्यात आले आहे.
कोणत्या महिला वैद्यकीय गर्भपात करवून घेऊ शकतात?
एमटीपी हा भारतातील महिलांसाठी प्रजनन संबंधित आरोग्याचा अधिकार आहे. कोणतीही महिला खालील परिस्थितीत एमटीपी करवून घेऊ शकते.
गर्भपात कसा केला जातो?
गर्भपातासाठी सामान्यत: दोन पद्धती वापरल्या जातात.
१- वैद्यकीय गर्भपात : हा गर्भपात औषधांच्या मदतीने केला जातो.
२- सर्जिकल गर्भपात : गर्भपात करण्यासाठी डायलेशन आणि इव्हॅक्युलेशन (D&E) प्रक्रिया अवलंबली जाते.
गर्भपाताबाबत भारतात कठोर कायदे आहेत, ज्यात गर्भपाताची मुदत निश्चित करण्यात आली आहे. यानुसार, महिलेचा गर्भधारणेनंतर सात आठवड्यांच्या आत रुग्णालयात दाखल न करता वैद्यकीय गर्भपात केला जाऊ शकतो. अशा परिस्थितीत, महिला घरीच राहून डॉक्टरांनी लिहून दिलेली औषधे घेऊ शकते. सात आठवड्यांनंतर मात्र, ते वैद्यकीय देखरेखीखाली केले पाहिजे आणि यासाठी त्या महिलेला एका दिवसासाठी रुग्णालयात दाखल करावे लागेल. कारण सात आठवड्यांनंतर गर्भपात केल्यास त्या महिलेला काही समस्या उद्भवण्याचा धोका असतो.
गर्भपाताची गोळी खाल्ल्यानंतर काय होते?
गर्भपाताच्या गोळ्या नेहमीच डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच घ्याव्यात. या गोळ्या कशा प्रकारे काम करतात जाणून घेऊया..
गर्भपाताच्या गोळीचा वापर कसा करावा?
महिलांना दोन वेगवेगळ्या प्रकारच्या गोळ्या घ्याव्या लागतात. डॉक्टरांच्या देखरेखीखाली पहिली गोळी घेतल्यानंतर ३६ ते ४८ तासांनंतर दुसरी गोळी घेण्यासाठी पुन्हा डॉक्टरांकडे जावे लागते.
पहिली गोळी गर्भपातासाठी गर्भाशयाला तयार करते. सर्विक्स गर्भाशयात विकसित होणाऱ्या अर्भकास आधार देते. हे औषध सर्विक्सला नरम करते. याव्यतिरिक्त, ते प्रोजेस्टेरॉनला थांबवते आणि गर्भाशयाच्या पृष्ठभागाला तोडते. तर दुसरी गोळी गर्भाशय संकुचित होण्यास मदत करते, ज्यामुळे गर्भ आणि गर्भाशयाचे अस्तर (यूटेराइन लाइनिंग) बाहेर पडून जातात.
गर्भधारणेच्या सुरुवातीच्या आठवड्यात गर्भपाताच्या गोळ्यांची शिफारस केली जाते, त्यानंतर सर्जिकल गर्भपात करणे योग्य मानले जाते. गर्भधारणेच्या 20 आठवड्यांपर्यंत वैद्यकीय गर्भपात वैध आहे, परंतु एमटीपी कायद्यानुसार 12 आठवड्यांनंतर गर्भपात करण्यासाठी कमीतकमी दोन स्त्रीरोगतज्ज्ञांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.
गर्भपाताच्या गोळ्यांचे दुष्परिणाम :
एमटीपीमध्ये कोणत्या समस्या आहेत?
गर्भपात न होणे : कधीकधी गर्भपाताच्या गोळ्या योग्यरित्या काम करत नाहीत, ज्यामुळे गर्भावस्था सुरूच राहते. तथापि, या परिस्थितीत गर्भावस्था सुरू राहिल्यास गर्भाच्या विकासास धोका असतो. त्यामुळे अशा परिस्थितीत स्त्रीने शस्त्रक्रिया करुन गर्भपात करवून घेणे योग्य ठरते.
ऍलर्जी : काही महिलांना या गर्भपाताच्या गोळ्यांमुळे ऍलर्जी होऊ शकते. ज्यामुळे ऍलर्जी होण्याची शक्यता तसेच गर्भावस्था सुरूच राहण्याची शक्यता वाढते. जर या गोळ्या घेतल्यानंतर तुम्हाला कोणत्याही प्रकारची ऍलर्जी किंवा आरोग्याशी संबंधित समस्या उद्भवल्यास तात्काळ डॉक्टरांशी संपर्क साधावा. गर्भपाताच्या गोळ्या खाल्ल्यामुळे गर्भाशयाच्या संसर्गाचा धोका फारच कमी प्रकरणांमध्ये दिसून येतो. गर्भपात झाल्यानंतर काही दिवसांनी डॉक्टरांकडे जाऊन खात्री करावी की गर्भपात पूर्णपणेव्यवस्थितरीत्या झाला आहे की नाही. याव्यतिरिक्त, या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान शरीरसंबंध ठेवू नयेत, कारण यामुळे संसर्ग होऊ शकतो.
गर्भपातानंतरची काळजी :
काही महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा :
चांगल्या आणि समाधानी सेक्स लाईफसाठी काय करावे? तज्ज्ञांचं काय मत आहे? जाणून घ्या…
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात घडलेल्या एका गंभीर घटनेने सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास पुन्हा एकदा डळमळीत…
बुलढाणा : केंद्र सरकारच्या फुड स्ट्रीट योजने अंतर्गत विदर्भातील शेगांव आणि मराठवाडा विभागातील शिर्डी येथे…
मुंबई : पुणे शहरातील हडपसर आणि पिंपरी-चिंचवडमधील दापोडी-फुगेवाडी परिसरात विषारी दारू प्यायल्याने १२ नागरिकांचा मृत्यू…
पुणे : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत प्रदान करण्यात आलेल्या “राष्ट्रपिता महात्मा…
मुंबई : ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना’अंतर्गत महाराष्ट्रात विविध पदांसाठी तात्काळ भरती सुरू…
पुणे : पुणे शहर आणि जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढत असून भारतीय हवामान विभागाने (IMD)…