ग्लोबल

मोठी बातमी! तालिबानी काबुल विमानतळावरून 150 लोकांना आपल्यासोबत घेऊन गेले, यात अनेक भारतीयांचा समावेश

काबूल : काबूलमधून मोठी बातमी येत आहे. प्रसारमाध्यमांच्या वृत्तानुसार, काबूल विमानतळावरून 150 लोकांना तालिबानी आपल्यासोबत घेऊन गेले आहेत, ज्यात अनेक भारतीयांचा समावेश आहे. ते सध्या कुठे आहेत, याबाबत अद्याप काहीही माहिती मिळालेली नाही. या लोकांना घेऊन जाण्यामागे तालिबानचा काय हेतू आहे हे देखील स्पष्ट नाही. विमानतळावरील गोंधळामुळे त्यांना दुसऱ्या गेटमधून आत नेण्यात आले असावे, अशी शदेखील व्यक्त केली जात आहे. त्यातच काबूल विमानतळावरील गोंधळादरम्यान एका अफगाण मुलीचा मृत्यू झाल्याचेही वृत्त आहे.

अफगाणिस्तानात तालिबानच्या राजवटीत भारतीयांचे एअरलिफ्ट पण सुरू आहे. हवाई दलाच्या सी -130 जे विमानाने 85 भारतीयांना घेऊन काबूल विमानतळावरून आज सकाळी 10.30 वाजता उड्डाण केले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, आणखी 200 भारतीयांना आणण्याची तयारी केली जात आहे, यासाठी हवाई दलाचे सी -17 विमान स्टँडबायवर ठेवण्यात आले आहे.

अफगाणिस्तानमधील भारतीय दूतावासाच्या सर्व अधिकाऱ्यांना एअरलिफ्ट करण्यात आले आहे, परंतु काबूलसह इतर शहरांमध्ये सुमारे 1000 भारतीय अडकल्याचा अंदाज आहे. परराष्ट्र मंत्रालय त्यांचे स्थान आणि स्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे, कारण सर्व लोकांनी भारतीय दूतावासाशी संपर्क साधलेला नाही.

काबूलमधून भारतीयांना हवाई दलाच्या विमानांमध्ये आणले जात आहे. मंगळवारी 120 पेक्षा जास्त लोक ग्लोबमास्टर C-17 ने देशात परतले होते. यामध्ये काबूलमधील भारतीय दूतावासाचे अधिकारी, आयटीबीपीचे कर्मचारी आणि इतरांचा समावेश होता. यापूर्वी सोमवारीही 45 लोकांना विमानातून हलवण्यात आले होते.

Share this :
थोडक्यात घडामोडी टीम

कमीत कमी शब्दांमध्ये बातम्या देणारे, आजच्या घडीला थोडक्यात घडामोडी हे मराठीतलं सर्वात वेगानं वाढणारं न्यूजपोर्टल - थोडक्यात घडामोडी

Recent Posts

बीड हादरलं! 50 वर्षीय नराधमाचा चिमुकलीवर दोन वेळा लैंगिक अत्याचार, पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल

बीड : बीड जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. परळी तालुक्यातील…

3 आठवडे ago

अवकाळीचे संकट! पुढील 4 दिवस वादळी पावसाचा इशारा; शेतकऱ्यांची चिंता वाढली…

मुंबई : देशातील हवामानात पुन्हा एकदा मोठे चढउतार पाहायला मिळत आहेत. हवामान विभागाने दिलेल्या ताज्या…

3 आठवडे ago

नाशिकमध्ये खळबळ! २४ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या परिचारिकेचा मृतदेह विहिरीत सापडला, प्रकरणात धक्कादायक खुलासा

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील निफाड परिसरात बेपत्ता झालेल्या एका परिचारिकेचा मृतदेह २४ दिवसांनी विहिरीत सापडल्याने…

3 आठवडे ago

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मेघे कुटुंबियांचे केले सांत्वन

नागपूर : ज्येष्ठ नेते व माजी मंत्री दत्ताभाऊ मेघे यांच्या निधनाचे वृत्त समजताच विदर्भात शोककळा…

3 आठवडे ago

पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला ४२.६४ लाखांचा गंडा, मॅट्रिमोनियल फ्रॉडचा धक्कादायक प्रकार

पुणे : वाकड परिसरात २८ वर्षीय सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेची लग्नाच्या आमिषाने तब्बल ४२.६४ लाख रुपयांची…

1 महिना ago

विलेपार्ले हादरले! बहिणीला पतीच्या मारहाणीतून वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या तरुणाची निर्घृण हत्या

मुंबई : २४ वर्षीय सागर गुप्ता या तरुणाचा मृत्यू झाला असून, त्याच्या हत्येप्रकरणी त्याच्या बहिणीचा…

1 महिना ago